Breaking

शनिवार, १२ मार्च, २०२२

संपूर्ण उसाचे गाळप झाल्याशिवाय कारखाना बंद होणार नाही ...... इतर कारखान्याला ऊस देऊन आपले नुकसान करून घेऊ नये ........एप्रिल मध्ये येणाऱ्या उसाला ज्यादा भाव देणार...... आमदार बबनदादा शिंदे



संपूर्ण उसाचे गाळप झाल्याशिवाय कारखाना बंद होणार नाही ...... इतर कारखान्याला ऊस देऊन आपले नुकसान करून घेऊ नये ......
..एप्रिल मध्ये येणाऱ्या उसाला ज्यादा भाव देणार...... आमदार बबनदादा शिंदे

बेंबळे।प्रतिनिधी।               

     नोंदीतील संपूर्ण उसाचे गाळप झाल्याशिवाय कारखाना बंद केला जाणार नाही ,शेतकऱ्यांनी भीतीपोटी इतर कारखान्यांना ऊस देऊ नये व आपले नुकसान करून घेऊ नये असे प्रतिपादन विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष आमदार बबनराव शिंदे यांनी केलेआहे.
     आ.बबनदादा शिंदे म्हणाले की यावर्षी उसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर झालेले असल्यामुळे व योग्य वेळी अनुकूल हवामान लाभल्यामुळे उसाच्या प्रति एकरी सरासरी वजनामध्ये वाढ झालेली आहे., त्यामुळे कारखान्याने मोठ्या प्रमाणात ऊस तोडणी यंत्रणा राबवून देखील व प्रति दिन 12 ते 13 हजार मेट्रिक टन गाळप करून देखील अद्यापही नोंदी घेतलेला शेतकऱ्यांचा बरचसा  खोडवा, निडवा ऊस शेतात उभा आहे .परंतु आता एक महिना कालव्याला पाणी होते तसेच सीना माढा  व भीमा- सिना बोगद्यातून देखील ऊसाला पाणी पुरवले आहे. त्यामुळे पाण्यावाचून कोणाचा ऊस जळेल असे होणार नाही . आ. बबन दादा पुढे म्हणाले की, आपला ऊस कारखान्याला गळीतास जाणार नाही अशा भीतीने इतर साखर कारखान्यांना ऊस देऊन शेतकऱ्यांनी आपले प्रति टन ३००ते ४०० रुपये नुकसान करून घेऊ नये ,कारण आजपर्यंतचा  अनुभव असा आहे की कांही साखर कारखाने  ज्यादा भाव देण्याचे प्रलोभन दाखवून शेतकऱ्यांच्या शेतातील ऊस गाळपासाठी नेतात व नंतर त्यांना एफ आर पी एवढी सुद्धा रक्कम पूर्ण दिली जात नाही व नंतर शेतकरी नाहक तळमळ करत राहतो, सद्यस्थिती निश्चित दूर होईल, संमंधीत प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतातील संपूर्ण उसाचे गाळप निश्चित केले जाईल व  नियमाप्रमाणे प्रत्येकी दहा दिवसाला उसाचे बिल बँकेत खात्यावर जमा केले जात आहे.

  चौकट ... 
एप्रिल मध्ये  येणाऱ्या उसाला एफ आर पी पेक्षा जादा दर देणार......

        आता उन्हाळा वाढत असला तरी एप्रिलमहीन्यात 1 एप्रिल ते 15 एप्रिल पर्यंत गळीतास येणाऱ्या उसाला विठ्ठल राव शिंदे कारखाना 100 रुपये प्रति टन तर 16 एप्रिल ते 30 एप्रिल दरम्यान  येणाऱ्या उसाला प्रति टन 200 रुपये एफआरपीपेक्षाही जादा दर देणार आहे, त्यामुळे शेतकरी बांधवांनी घाबरून न जाता व ईतर कारखान्याला ऊस न देता आपल्याच कारखान्याला ऊस घालावा व आर्थिक नुकसान टाळावे... 
                            आमदार बबनदादा शिंदे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा