*शेतकऱ्यांना दिवसा उच्च दाबाने १० तास वीज देण्यात यावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने साहाय्यक अभियंता तुळजापूर यांना निवेदन
*
प्रतिनिधी रूपेश डोलारे उस्मानाबाद.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र इंगळे यांच्या उपस्थितीत आज दिनांक,०४ मार्च २०२२, रोजी तुळजापूर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने, शेतकऱ्यांना दिवसा उच्च दाबाने १० तास वीज देण्यात यावी,या मागणीसाठी सहायक अभियंता महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी कार्यालय तुळजापूर यांना निवेदन देण्यात आले,तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने वीज बिलांची होळी करून राज्य सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला,यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र इंगळे, जिल्हा उपाध्यक्ष धनाजी पेंदे,तालुकाध्यक्षगुरुदास भोजने, शाहाजी सोमोशे , प्रदीप जगदाळे, संतोष भोजने, निलेश घाटे, विकास भोजने,अभिजीत साळुंखे, चंद्रकांत साळुंके, दिपक कोंडे, विनोद भोसले ,दयानंद भोसले, शंकरराव चव्हाण,यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रतिनिधी रूपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा