आदिवासी किनवट तालुका नक्षलग्रस्त यादीत कायम ठेवा
आमदार भीमराव केराम यांची मुख्यमंत्र्यांसह गृहमंत्र्यांकडे मागणी
नांदेड जिल्हा प्रतिनिधी
बालाजी सिरसाट
किनवट : किनवट ह्या आदिवासी तालुक्यात झालेल्या नक्षली कृती तसेच मागील काळात समोर आलेल्या काही नक्षली हालचालींच्या पार्श्वभूमीवर आदिवासी किनवट तालुका हा नक्षलग्रस्त यादीतून न वगळता यादीत तसाच कायम ठेवण्याच्या मागणीचे निवेदन आमदार भीमराव केराम यांनी मुख्यमंत्र्यांसह गृहमंत्र्यांना दिले आहे.
दि: १९-एप्रिल रोजी किनवट माहूर चे आमदार भीमराव केराम यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ना.उद्धव ठाकरे व गृहमंत्री ना.दिलीप वळसे पाटील यांना लेखी निवेदन देऊन सदरची मागणी केली आहे.दरम्यान या निवेदनाला गृह विभागाचे उपसचिव यांचे पत्र क्र.एनएएक्स-१२२०/प्र.क्र.२५३/विशा-१ व दिनांक १३/४/२०२२ चा संदर्भ देऊन असे म्हटले आहे की,तेलंगणा राज्य सीमेलगत घनदाट जंगलात किनवट हा आदिवासी तालुका असून,भौगोलिकदृष्ट्या विस्ताराने अधिक मोठा आहे.मागील काही वर्षापूर्वी या तालुक्यात नक्षलवादी कारवाया झाल्या असून,या भागात नक्षली कमांडर विजय कुमार नामक कुख्यात नक्षलवाद्याने धुमाकूळ घातला होता.तो सन १९९२ साली जूनापानी तालुका माहूर या जंगलात पोलीस चकमकीत मारला गेला.
तदनंतर काही काळानंतर या भागात नक्षली कारवाया तसेच हालचाली पुन्हा सुरू असल्याने अनेक वर्तमानपत्रातून प्रसिद्ध झाले तसेच प्रत्यक्ष ऐकावयाससही मिळाले.
दरम्यान या भागात शास्त्रधारी नक्षली आजही जंगलात बिनदिक्कतपणे फिरत असल्याची कुजबूज जनतेत होत असून याबाबत कोणत्याही प्रकारची खबरबाब पोलिसांना सांगण्यास स्थानिक लोक घाबरतात.याचे प्रमुख कारण म्हणजे पोलिसांच्या खबऱ्यांना नक्षलवाद्यांनी अमानुषपणे तुकडे करून मागील काळात जीवाने मारले होते.हीच ती दहशत असून आजही तेलंगणा विदर्भ सीमेवरून या भागात नक्षलवाद्यांच्या हालचाली व असलेला वावर नाकारता येत नाही.तर किनवट हा आदिवासी नक्षलग्रस्त भाग जिल्ह्याच्या ठिकाणाहून सुमारे १५० कि.मी अंतरावर असून मागील नक्षली कारवायाची दहशत व चकमक माहित असल्याकारणाने या भागात अधिकारी-कर्मचारी सेवा देण्यासाठी आजही धजावत नसून केवळ नक्षली भागाच्या वेतनात जास्तीचे वेतन भत्ते मिळत असल्याने ते या विभागात सेवा देत असल्याचे वास्तव आहे.यामुळेच या भागात सी-४७ पोलीस पथकाची स्थापना झाली आहे.
एकंदरीत विदर्भ तेलंगणा राज्यातील मागील काळात झालेल्या तसेच संभाव्य नक्षली कारवाया लक्षात घेऊन भविष्यात या भागात नक्षली हालचाली वाढून विद्रोही अनुचित प्रकार घडू नये यासाठी नांदेड जिल्ह्यातील आदिवासी किनवट तालुका हा भाग नक्षलग्रस्त यादीतून न वगळता यादीत कायम ठेवावा अशी लिखित मागणी आमदार भीमराव केराम यांनी केली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा