*कुर्डुवाडी रेल्वे गेट वरील उड्डाण पूलास केंद्रीय वहातूक मंत्री नितीन गडकरींची मंजुरी...*
*कुर्डुवाडी आर.पी.आय.च्या आंदोलनास व केंद्रीय समाज कल्याण राज्यमंत्री रामदासजी आठवले यांच्या प्रयत्नास अभूतपूर्व यश...*
*रेल्वे कामगार नेते महेंद्र जगताप यांच्या जिद्द व चिकाटीचे सर्वत्र कौतुक*
AJ 24 Taas News
प्रतिनिधी--अरुण कोरे(पत्रकार)यांजकडून...
कुर्डुवाडी शहराच्या विभाजनास कारणीभूत ठरलेल्या रेल्वे गेटवरील उड्डाण पूलास केंद्रीय वहातूक मंत्री नितीन गडकरींनी मंजुरी दिल्याचे सोलापूर येथे घोषित केल्याने शहर विकासाचा महामार्गच अखेर खुला होणार असल्याने शहरवासियांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
२ ऑगष्ट २०१९ ला रेल्वेने गेट नंबर ३८ कायमस्वरुपी बंद केल्यानंतर गेल्या पावणेतीन वर्षांपासून संपूर्ण शहरच दुभंगले गेले होते.शहराचा विकासच ठप्प झालेने शहरवासियांची व परिसरातील नागरिकांची फार मोठी कुचंबणा होऊन शहरास अवकळा आली होती.
रेल्वेच्या अडेलतट्टू धोरणांच्या विरोधात रेल्वे वसाहतीतील नागरिकांनी विशेषतः आर.पी.आय. आठवले गटाचे राज्य विभागीय कार्याध्यक्ष बापूसाहेब जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली आकाश जगताप, अमरकुमार माने,चंद्रकांत वाघमारे, स्वाभिमान संघटनेचे संजय टोणपे,आदींनी गेट बंद होण्याच्या अगोदर पासूनच रेल्वेच्या अडेलतट्टू धोरणांच्या विरोधात मोर्चा,कामबंद आदी आंदोलनात्मक पवित्रा २०१६ पासूनच घेऊन वेळोवेळी रेल्वेच्या भुयारी मार्गास विरोध करुन रेल्वे सुरक्षा दलाच्या दबावासही न जुमानता रेलरोकोचा ईशाराही दिला होता.
वास्तविक पाहता पंचवीस वर्षांपूर्वी याच रेल्वे गेटवर उड्डाण पूल मंजूर झाला होता.पण कुर्डुवाडी शहर विकासाचा विचार न करता राजकारण करून शहर बंद ठेऊन शहरातील व्यापा-यांनीच काही उपद्रवी संघटनांना हाताशी धरून तो प्रयत्न हाणून पाडला होता.तत्कालीन जिल्हाधिकारी करंदीकर यांनी उड्डाण पूल होऊ द्या अडचणींचे निराकरण करु अशा केलेल्या आवाहनासही झारीतील शुक्राचार्यानी न जुमानता दबाव निर्माण केला होता.
कुर्डुवाडी शहराची आर्थिक नाडी रेल्वे वर्कशॉप्स व वसाहत असताना त्यास शहरवासियांनी विचार न करता रेल्वे वसाहतीतील नागरिकाबाबत हेताद्द्वैश धरुन अखेरपर्यंत साथच दिली नाही.अन् २ ऑगस्ट २०१९ ला मध्यरात्रीपासून रेल्वेने गेट कायमस्वरूपी बंद करण्याचा बोर्ड लावला आणि रेल्वे वसाहतीतील नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने विरोध केला.
तरीही राजकारण बाजूला ठेवून शहर विकासाच्या दृष्टीने कुणीही पुढे आले नाही.अन् तेव्हा पासून शहराच्या अवकळेस सुरुवात झाली.
रेल्वेने वेळोवेळी भुयारी मार्ग करण्याच्या प्रयत्नाला रिपाइंने प्रखर आंदोलन करून विरोध केला.
गेल्या वर्षभरापासून कुर्डुवाडी रेल्वे कामगार संघटनेचे अध्यक्ष महेंद्र जगताप यांनी दिल्लीत सातत्याने जाऊन केंद्रीय समाज कल्याण राज्यमंत्री रामदासजी आठवले व माढ्याचे खासदार निंबाळकर यांना हाताशी धरून केंद्रीय वहातूक मंत्री नितीन गडकरींची भेट गेल्या सहा महिन्यांपासून घेऊन या प्रश्नावर प्रशासकीय पातळीवर सातत्याने पाठपुरावा करून भंडाऊन सोडलं होतं.
प्रशासकीय येणा-या अडचणींवर महेंद्र जगताप यांनी जातीने लक्ष घालून सार्वजनिक बांधकाम खात्याच्या पत्रापासून खालपासून वरपर्यंत सातत्याने पाठपुरावा करून अडचणींचे निवारण केले होते.
कुर्डुवाडी बरोबरच सांगोला व सोलापूर जिल्ह्यातील सर्वच उड्डाण पूलास मंजुरीची घोषणा गडकरींनी केली आहे.
रेल्वे गेट वरील उड्डाण पूल बार्शी कडून येऊन पंढरपूर रोड व टेंभुर्णी रोडवर टू वे असणार आहे.त्यामुळे दुभंगलेले शहर एकमुखी होऊन शहराचा चेहरामोहरा बदलणार असल्याने नागरिकांत आनंद व्यक्तवून समाधान व्यक्त केले जात आहे.
रिपाइंचा प्रखर विरोध आणि रेल्वे कामगार नेते महेंद्र जगताप यांच्या प्रयत्नास अभूतपूर्व यश प्राप्त झाले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा