Breaking

शनिवार, ३० एप्रिल, २०२२

कंदर ग्रामपंचायत गैरव्यवहार प्रकरणी सरपंच व ग्रामसेवक यांच्यावर कारवाई करावी .मुंबई हायकोर्टाचे विभागीय आयुक्तांना आदेश*



*कंदर ग्रामपंचायत गैरव्यवहार प्रकरणी सरपंच व ग्रामसेवक यांच्यावर कारवाई करावी .मुंबई हायकोर्टाचे विभागीय आयुक्तांना आदेश* 


 माढा तालुका प्रतिनिधी :-कंदर येथील सामाजिक कार्यकर्ते वि .का . सोसायटीचे माजी चेअरमन आण्णासाहेब पवार यांनी कंदर ग्रामपंचायत मध्ये बाजार तळ शौचालय बांधणी व चौदाव्या वित्त आयोग तील अपहार प्रकरणात सरपंच मनिषा भास्कर भांगे व तात्कालिन ग्रामसेवक ए.एम. माने  यांच्या विरोधात गटविकास अधिकारी मनोज राऊत यांच्याकडे  तक्रार अर्ज दाखल केला होता. या अर्जाची दखल घेऊन गटविकास अधिकारी मनोज राऊत यांनी कंदर ग्रामपंचायत मध्ये झालेल्या तीन लाख दहा हजार चारशे रूपयांच्या अपहार केल्याप्रकरणी ग्रामसेवक व सरपंच यांच्याकडून हि रक्कम वसूल करण्याची नोटीस बजावून पुढील कारवाई साठी दोषारोप पत्र सादर केले होते. 

गटविकास अधिकारी मनोज राऊत यांनी मुख्याधिकारी यांना अहवाल दिल्यानंतर मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी विभागीय आयुक्त यांना अहवाल देणे गरजेचे होते व विभागीय आयुक्त यांनी सरपंच यांना पदावरून निलंबित करणे व ग्रामसेवक यांच्यावर कारवाई करणे अपेक्षित होते.मात्र प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून कारवाईस टाळाटाळ होत असल्याने पवार यांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली होती. अखेर मुंबई हायकोर्टाने   मुख्यकार्यकारी अधिकारी विभागीय आयुक्त यांना आदेश दिले असून तात्काळ ग्रामपंचायत कलम अधिनियम 39(1)प्रमाणे कारवाई करावी असे आदेश दिले आहेत. 

     कंदर ग्रामपंचायतीवर भास्कर भांगे यांची सत्ता असून भांगे यांच्या पत्नी मनिषा भांगे या सरपंच आहेत. तर तात्कालिन ग्रामसेवक हे जेऊर येथील भ्रष्टाचार प्रकरणात देखील चौकशी फेऱ्यात अडकलेले आहेत.  कंदर ग्रामपंचायत भ्रष्टाचार प्रकरणी आत्ता थेट न्यायालयाने हस्तक्षेप केल्याने या प्रकरणाचा कसा शेवट होतो? सरपंच ग्रामसेवक यांच्याकडून रक्कम वसूल होणार का याकडे लक्ष लागले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा