*तुळजापूर येथे मातंग समाजाच्या वतीने तहसील कार्यालयावर भव्य आक्रोश मोर्चा काढण्यात आला*
प्रतिनिधी रूपेश डोलारे उस्मानाबाद.
दिनांक २० /५/२०२२,रोजी तुळजापूर येथे सकल मातंग समाज यांच्या वतीने, तहसील कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला, व तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आहे, या निवेदनात असे नमूद केले आहे की,औरंगाबाद मध्ये घडलेले प्रकरण मातंग समाजाच्या एका युवकाचा निर्गुण हत्या केल्याप्रकरणी दोषींला फाशीची शिक्षा झाली पाहिजे व महाराष्ट्रभर मातंग समाजावर अन्याय अत्याचार विरोधात मातंग समाजाचा आज तहसील कार्यालय आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता त्यावेळी विविध संघटना आणि पक्षाचे पाठिंबा तरी प्रमुख्याने मानवहित लोकशाही पक्ष तसेच लहुजी शक्ती सेना व भिम अण्णा सामाजिक संघटनेचा आधुनिक लहुजी शक्ती सेना सामाजिक संघटना व इतर संघटनेने जाहीर पाठिंबा देन्यात आला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा