Breaking

सोमवार, २० जून, २०२२

राज्यसभेच्या निवडणुकीप्रमाणे विधान परिषदेच्या निवडणुकीत ही धक्कादायक निकालाची शक्यता?



राज्यसभेच्या निवडणुकीप्रमाणे विधान परिषदेच्या निवडणुकीत ही धक्कादायक निकालाची शक्यता?




महाड प्रतिनिधी/ मिलिंद माने


राज्यसभा निवडणुकीप्रमाणे  विधान परिषद निवडणुकीतही भारतीय जनता पार्टीचे सर्व पाच उमेदवार विजय होतील अशी रणनीती पुन्हा एकदा भाजपा . वापरून  महा विकास आघाडीला धक्का देण्यासाठी पुन्हा एकदा शिवसेनेचे माजी नेते आशिष कुलकर्णी यांना सज्ज केल्याचे  बोलले जात आहे
राज्यसभेची जागा जिंकून भाजपाने महाराष्ट्रातील सत्ताधारी महा विकास आघाडी सरकारला धक्का दिला व त्यासाठी रणनीती तयार करण्याचे श्रेय आशिष कुलकर्णी यांना दिले जाते आशिष कुलकर्णी एकेकाळी शिवसेनेत असताना .शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जवळचे मानले जात होते. परंतु ते आता भाजपा मध्ये आहेत शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव करून तिसरी जागा भाजपाला जिंकून देणारे व निवडणुकीची रणनीती तयार करणारे आशिष कुलकर्णी प्रमुख नेते आहेत देवेंद्र फडणवीस यांच्या खास मर्जीतील ते असून सध्या ते पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष आहेत त्यांनी आपल्या कारकीर्दीची सुरुवात शिवसेनेतून केली होती
सन 2003 मध्ये ते काँग्रेसमध्ये होते काही वर्षांपूर्वी त्यांनी सन दोन हजार सतरा मध्ये काँग्रेसमधून भाजपात प्रवेश केला शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना महाबळेश्वरच्या शिबिरामध्ये कार्याध्यक्षपदी बढती दिली त्यावेळी तत्कालीन शिवसेना नेते व आत्ता भाजपामध्ये असलेले केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याशी आशिष कुलकर्णी यांचे घनिष्ठ संबंध होते सन 2009 च्या निवडणुकीत सहा संसदीय मतदारसंघाची जबाबदारी काँग्रेसने त्यांना दिली होती तेव्हा त्यांनी या जागा काँग्रेस पक्षाला जिंकून दिल्या होत्या गांधी घराण्याने कुलकर्णी यांची राजकीय चाणक्य नीति ची चाल बघून त्यांना काँग्रेसचे तत्कालीन राजकीय सल्लागार अहमद पटेल यांच्यासोबत काम करण्यास दिल्लीस पाचारण केले होते 2010 मध्ये त्यांनी काँग्रेस उमेदवार विजय सावंत यांना विधान परिषदेवर निवडून आणण्यासाठी राजकीय चाणक्य वापरले होते त्यानंतर त्यांनी 2017 मध्ये काँग्रेसला रामराम करून काही काळ स्वतंत्रपणे काम केले होते
( विधान परिषदेच्या निवडणुकीत ही धक्कादायक निकालाची अपेक्षा)
सन 2008 व 2010 मध्ये झालेल्या विधान परिषद निवडणुकीत मतांची फाटाफूट होऊन धक्कादायक निकाल लागले होते 2008 मध्ये काँग्रेसकडे पुरेशी मध्ये असतानाही सुधाकर गणगणे यांचा पराभव झाला होता त्या वेळी तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना मोठा धक्का बसला होता सन 2010 मध्ये 83 आमदार असलेल्या काँग्रेसचे तीन उमेदवार निवडून येऊ शकत होते पण तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आपले राजकीय ताकद वापरून व सत्तेच्या जोरावर चौथा उमेदवार उभा केला व विजया करिता 2619 पहिल्या पसंतीचे मतांची आवश्यकता होती काँग्रेस. चे चौथा उमेदवार विजय सावंत यांना पहिल्या पसंतीची अवघी तेराशे मते मिळाली काँग्रेसचे तीन व राष्ट्रवादीचे दोन उमेदवारांचा दुसऱ्या पसंतीच्या आधारे पुरेशी मते नसतानाही काँग्रेसचा चौथा उमेदवार निवडून आला त्या निवडणुकीत विद्यमान परिवहन मंत्री अनिल परब यांनी भाजपच्या शोभाताई फडणवीस यांचा अत्यंत चुरशीच्या लढाईत पराभव केला परब यांना 2415 तर शोभाताई यांना 2291 मते मिळाली होती मनसे व छोट्या पक्षांच्या पाठिंब्यावर अशोक चव्हाण यांनी पाच मते अतिरिक्त असताना चौथी जागा निवडून आणली होती
राज्यसभेचे प्रमाणे विधानपरिषद निवडणुकीत अनिल देशमुख व नवाब मलिक यांना मतदानाचा अधिकार मिळाला नाही तरी 285 मतदार या निवडणुकीत मतदान करतील त्याआधारे 25. 91. म्हणजे 26 मतांचा कोटा असेल पंचावन्न आमदार असलेल्या शिवसेनेचे 2 .53 आमदार असलेल्या राष्ट्रवादीचे. दोन व 44 आमदार असलेल्या काँग्रेसची दुसरी जागा निवडून येण्याकरिता 11 मतांची आवश्यकता असेल
विधान परिषद भाजपचा पाचवा उमेदवार प्रसाद लाड व काँग्रेसचे दुसरा उमेदवार भाई जगताप यांच्यात लढत होईल पाचव्या जागेसाठी भाजपला 128 ते 130 मते लागतील राज्यसभा निवडणुकीत भाजपला 123 आमदारांचे पाठबळ मिळाले होते विधान परिषदेत गुप्त मतदान असते ही निवडणूक जिंकण्यासाठी प्रत्येक उमेदवाराला सव्वीस मतांची गरज लागेल चाणक्य कोण हे वीस तारखेच्या निकालानंतर कळेल निव्वळ गणित चांगले असून चालत नाही तर राज्यशास्त्राचा अभ्यास असावा लागतो राज्यसभेने जर शंभर टक्के करमणूक केली असेल तर विधान परिषद तीनशे टक्के  करमणूक करणार असल्याचे राजकीय निरीक्षक बोलत आहे एकंदरीत काय तर राज्यसभेचे प्रमाणे विधान परिषदेची निवडणूक करिता भाजपने पुन्हा एकदा आशिष कुलकर्णी यांची राजकीय चाणक्य नीति वापरण्याचे ठरवले आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा