लऊळ मंडळाच्या 12 गावातील शेतकऱ्यांची अतिवृष्टीची नुकसान भरपाई सोमवारपासून बँक खात्यात जमा होणार
आमदार बबनदादा शिंदे
बेंबळे।प्रतिनिधी
मागील 2021 साली डिसेंबर महिन्यात माढा तालुक्यातील लवूळ महसूल मंडळात अतिवृष्टी होऊन शेती पिकांचे व मालमत्तेचे मोठे नुकसान झाले होते, या नुकसानग्रस्त 4 हजार119 बाधित शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाई पोटी शासनाने 4 कोटी 70 लाख 91 हजार 60 रुपये निधी जिल्हा कार्यालयाकडे वर्ग केला असून तब्बल नऊ महिन्यानंतर सोमवार दिनांक 3 ऑक्टोबर 22 पासून संबंधित बारा गावातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर ही रक्कम जमा होणार असल्याची माहिती आमदार बबनदादा शिंदे यांनी दिली आहे.
अधिक माहिती अशी की राज्यात नोव्हेंबर 2021 ते मे 2022 या कालावधीत गारपीट व अवेळी झालेल्या पावसामुळे राज्यातील काही जिल्ह्यात शेती पिकांचे व मालमत्तेचे मोठे नुकसान झाले होते. या नुकसान ग्रस्तांना मदत देण्याविषयी राज्य कार्यकारी समितीची 27 जुलै 22 रोजी बैठक पार पडली व आर्थिक मदत देण्याविषयी शासनाने मान्यता दिली. यानंतर माढा तालुक्यातील लवूळ मंडळातील बारा गावातील 4 हजार119 नुकसान बाधित शेतकऱ्यांना भरपाई पोटी एकूण 4 कोटी 70 लाख 91 हजार 60 रुपये निधीला मंजुरी मिळाली असून जिल्हा कार्यालय कडे वर्ग झालेली आहे. ही रक्कम आता सोमवार दिनांक 3 ऑक्टोबर पासून संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचा आदेश सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिला असल्याची माहिती आमदार बबनदादा शिंदे यांनी आवर्जून सांगितली आहे.
..चौकट....।।..
लवूळ मंडळातील या 12 गावातील शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाई....
पालवण, भोईंजे, भूताष्टे, चिंचोली, लवूळ, पडसाळी, भेंड, उजनी (मा), शिराळ (मा), होळे खुर्द, सापटणे (भो) ,आणि शिंदेवाडी.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा