Breaking

मंगळवार, ११ ऑक्टोबर, २०२२

अतिवृष्टीमुळे वाहून गेलेल्या रस्ते आणि पुलांची युद्धपातळीवर दुरुस्ती व्हावी....आ. बबनदादा शिंदे



अतिवृष्टीमुळे वाहून गेलेल्या रस्ते आणि पुलांची युद्धपातळीवर दुरुस्ती व्हावी....आ. बबनदादा शिंदे  
 

बेंबळे।प्रतिनिधी                     

         माढा तालुक्याच्या काही भागात नुकतीच ढगफुटी सदृश्य अतिवृष्टी झाल्यामुळे ग्रामीण भागातील रस्ते व पूल यांचे अतोनात नुकसान झाले आहे, या वस्तुस्थितीचे तातडीने चे पंचनामे होऊन युद्ध पातळीवर रस्ते व पूल दुरुस्त व्हावे अशी मागणी आमदार बबनदादा शिंदे यांनी शासनाकडे केली आहे. वृत्तांत असा की गुरुवार दिनांक 6 ऑक्टोबर रोजी दुपारपासून रात्री उशिरापर्यंत माढा तालुक्यातील निमगाव टे. कुर्डूवाडी,भोसरे, कव्हे,जाकले, चौभे पिंपरी ,ढवळस ,सापटणे,  अकोले बु।।, वरवडे ,परिते, बेंबळे, कान्हापुरी, परिसरात अवघ्या काही वेळात ढगफुटी सदृश्य 146 मिलिमीटर पाऊस झालेला असल्यामुळे शेती ,पिके ,घरे, रस्ते, पुल ,तलाव आदींचे अतोनात नुकसान झाले आहे,  अ

नेक ठिकाणी रस्ते खचून वाहून गेले आहेत पूल ढासळलेले आहेत, वाहून गेले आहेत व दगड आणि भरावा उघडा पडला आहे, पाझर तलाव फुटून गेले आहेत. यामुळे सध्या ग्रामीण भागातून ये- जा करणे व दैनंदिन वाहतूक करणे अतिशय अवघड होऊन बसले आहे, तरी अशा पुलांचे आणि रस्त्यांचे तातडीने पंचनामे होऊन याच्या दुरुस्तीची कामे युद्धपातळीवर करण्यात यावीत अशी मागणी आमदार बबनदादा शिंदे यांनी शासनाकडे केली आहे . विशेष म्हणजे लवकरच साखर कारखान्याचा ऊस गळीत हंगाम सुरू होणार आहे त्यामुळे अशा रस्त्यावरून उसाची वाहतूक करणे बैलगाड्या व ट्रॅक्टरला अवघड होऊन बसणार आहे याचा शासनाने त्वरित विचार करावा असेही कळवण्यात  येत आहे. याप्रसंगी बेंबळे जिल्हा परिषद सदस्य प्रतिनिध बंडूनाना ढवळे व साखर कारखान्याचे संचालक पोपटमामा चव्हाण यांचे सह नुकसानग्रस्त गावातील  नागरिक उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा