संत गाडगे महाराज यांची दशसूत्री विचार फलक तात्काळ पुनर्स्थापित करा--संभाजी ब्रिगेड
नांदेड जिल्हा प्रतिनिधी
बालाजी सिरसाट
नांदेड : शाळेहून नाही! थोर ते मंदीर !!
तीर्थी धोंडापाणी! देव रोकडा सज्जनी !! अश्या साध्या - सरळ - सोप्या भाषेत, सोज्वळपणे किर्तनातून साऱ्या जगाला विज्ञानवादाचा संदेश देणारे, समाजसुधारक, कर्मयोगी संत गाडगेबाबा यांची दशसूत्री विचार असणारे फलक दि.१२ मार्च २०२० रोजी तात्कालीन मुख्यमंत्री मा.उद्धवजी ठाकरे यांच्या महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर लावलेले होते. जेमतेम अडीच वर्षे झाली होती दशसूत्री फलकाला लावून.दशसूत्री विचार येथे काम करणाऱ्या साध्या शिपायापासून ते मंत्र्यांना, कामानिमित्त येणाऱ्या लोकांना प्रेरणा देत होती. सरकारचं कामकाज निस्सीम / निस्वार्थीपणे भ्रष्टाचारविरहीत चालावे हा त्यामागील हेतू होता असं या फलकाचं अनावरण करताना महाविकास आघाडी सरकारचे मा. मुख्यमंत्री यांनी अनावरण समारंभ कार्यक्रमावेळी आपल्या भाषणात म्हटलं होतं.ही दशसुत्री का काढली ही एक शंकेचीच बाब आहे.दशसुत्री काढल्याच्या निषेधार्थ संभाजी ब्रिगेड च्या गांधीजींच्या मार्गाने उपोषण करत सत्याग्रह आंदोलन करण्यात आले.
मंत्रालयातील मंत्री आणि मंत्रालयात येणाऱ्यांनी संत गाडगेबाबांच्या विचारांची शिदोरी घेऊन / प्रेरणा घेऊन त्यापद्धतीने राज्याचा कार्यभार चालला पाहीजे हा त्यामागील महाविकास आघाडी सरकारचा प्रामाणिक हेतू होता. त्यावेळी सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः ही तात्कालीन सरकारमध्ये मंत्री होते. त्यामुळे ते त्यांना ठाऊकच आहे. असं असतांना अडीच वर्षे सरकारला प्रेरणा देणाऱ्या संत गाडगेबाबांच्या दशसूत्रीचा फलक वर्तमान (शिंदे-फडणवीस) सरकारने मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावरून मागचा पुढचा विचार न करता सरळ सरळ काढून टाकने ही निंदनीय व निषेधार्ह आहे. यामुळे महाराष्ट्रातील जनतेत,सर्व परिवर्तनवादी संघटना व सर्व संत परंपरेतील लोकांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे.त्यांच्या भावना दुःखावल्या गेल्या आहेत.महाराष्ट्र सरकारच्या या कृत्याचा संभाजी ब्रिगेड तीव्र निषेध महाराष्ट्रभरा प्रमाणे नांदेड मधेही नोंदवीण्यात आला.
सरकारला आमचे विचारने आहे की..... काय आपल्याला संत गाडगे महाराजांचे विचार अमान्य आहे का?.... मागील काही दिवसांत असं काय घडलं की, आपल्याला गाडगे महाराजांचे विचार नकोसे झाले ?... गाडगेबाबांच्या विचारांना डावलून नवीन कोणता विचार राज्य हिताचा आपल्याला सापडला आहे ?....... ते महाराष्ट्राच्या जनतेला सांगावं लागेल.
समाजसुधारक, कर्मयोगी संत गाडगेबाबांचे कार्य हे साऱ्या जगाने आदर्श घ्यावा असे प्रेरणादायी आहे. त्यांनी समाजातील दुबळे, अनाथ, अपंगांची सेवा केली. शाळा / अनाथ आश्रमं, रुग्णालय, धर्मशाळा बांधली. स्वतःच्या गाठीला एक रुपयाही न ठेवता तोच पैसा समाज हितासाठी लावला. गोर गरिबांच्या मुलांना शिक्षणासाठी मदत केली. लोकांच्या डोक्यातून बुरसटलेल्या विचारांची मशागत करून विज्ञाननिष्ठ विचारांची पेरणी केली. स्वच्छ चारित्र्याची शिकवण दिली. लोकांनी निर्व्यसनी रहावं / चोरी लबाडी करू नये याची शिकवण दिली. राज्याचं किंवा देशाचं सरकार कुणाचंही असु दे ! त्यांनी सर्व प्रथम अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, रोजगार, गरीब मुलां-मुलीचं लग्न वगैरे यांवर काम करावं असं त्यांनी आपल्या दशसूत्री विचारातून प्रबोधन केलं. हीच दशसूत्रीआपल्या सरकारला मान्य नाही असे आपण स्वतः संत गाडगे महाराजांच्या दशसूत्री फलक मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावरून काढून सिद्ध केलेलं आहे. नांदेड संभाजी ब्रिगेड ने याविरुद्ध महात्मा गांधीजींच्या पुतळ्यासमोर उपोषण करत सत्याग्रह आंदोलन केले आहे. सरकारने काढलेला फलक पुन्हा जैसे थे ठेवावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असे यावेळी संभाजी ब्रिगेड ने म्हंटले आहे.यावेळी संभाजी ब्रिगेड लोकसभा अध्यक्ष संकेत पाटील,जिल्हाध्यक्ष सुभाष कोल्हे, जिल्हाध्यक्ष भगवान कदम,कमलेश कदम, प्रदिप गुबरे, गजानन पवार, भुजंग जाधव, संतोष सवराते अशोक कदम,अंकुश कोल्हे,मारोती मेंडेवाड,प्रा डॉ जयदीप वाडकर, स्वप्निल शिंदे,सतीश धुमाळ,शिवम कदम,अनिल दापके,संतोष धामदरीकर,व्यंकटराव कदम, परमेश्वर खोसे,माणिक पोहरे,वैजनाथ मोहीते,राजु कदम, लालु बुधेवाड यांच्या सह अनेकांची उपस्थिती होती.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा