आम्ही दिवाळी साजरी करणार नाही-सौ.अनुराधा नागवडे...
श्रीगोंदा-नितीन रोही,
सविस्तर असे की सौ.नागवडे ह्या पत्रकार परिषदेत म्हणाल्या तालुक्यातील सर्वच शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले असून पंचनामे न करता सरसकट शेतकऱ्यांना हेक्टरी ७५हजारांची मदत मिळण्यासाठी मुख्यामंत्र्यांकडे जाणार आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना देखील आर्थिक मदत सरकारने करावी,सततच्या पाऊसामुळे दूधव्यवसाय देखील अडचणीत सापडला आहे त्याला सुद्धा सरकारने मदत करावी अशी मागणी कृषिमंत्री,पालकमंत्री यांच्याकडे करणार असल्याचे सांगितले.
सध्याचे सरकार शेतकऱ्यांना नक्की मदत करेल अशी अपेक्षा असून मदत न मिळाल्यास रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा देखील नागवडे यांनी सरकारला दिला.
सदर पत्रकार परिषदेला युवा पिढीचे कर्तव्यदक्ष सरपंच आदेशशेठ नागवडे,संचालक प्रशांत दरेकर,संदीप औटी,योगेश भोईटे,काँग्रेस तालुकाध्यक्ष धर्मनाथ काकडे,विजय खराडे उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा