जिल्ह्यातील साखर कारखान्याचे चेअरमन व कार्यकारी संचालकांची विठ्ठलराव शिंदे कारखान्यात मंगळवारी बैठक....
वाहन मालकांच्या होणाऱ्या फसवणुकी संदर्भात विचार विनिमय होऊन ठोस निर्णय घेणार.....
आमदार बबनदादा शिंदे
बेंबळे।प्रतीनीधी। फोटो
ऊस तोडणी मुकादम, ठेकेदार व मजूर यांचेकडून ऊस वाहतूक करणाऱ्या वाहन मालकांची प्रत्येक वर्षी होत असलेली लाखो रुपये फसवणुकी संदर्भात विचार विनिमय करून यातून निश्चित असा ठोस मार्ग काढण्यासाठी विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना युनिट-१ गंगामाईनगर- पिंपळनेर (ता.माढा) येथे सोलापूर जिल्ह्यातील सर्व सहकारी व खाजगी साखर कारखान्यांच्या चेअरमन, कार्यकारी संचालक, जनरल मॅनेजर व शेतकी अधिकारी यांची मंगळवार दिनांक 6 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता कारखाना कार्यस्थळावर मीटिंग आयोजित करण्यात आलेली असल्याची माहिती विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष आमदार बबनदादा शिंदे यांनी दिलेली आहे . या बैठकीस साखर आयुक्त शेखर गायकवाड, साखर सहसंचालक पांडुरंग शेळके, सोलापूर जिल्हा पोलीस अधीक्षक (ग्रामीण) शिरीष सरदेशपांडे व ऊस तोडणी वाहतूकदारांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.
ऊस तोडणीसाठी मजूर टोळ्या करण्याचेवेळी मुकादम व ठेकेदार यांचे वर विश्वास ठेवून वाहन मालक त्यांना लाखो रुपये हातात देतात, परंतु नेमके साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू होण्याचे वेळी मुकादम व मजूर ,वाहन मालकांची फसवणूक करतात व येतच नाहीत तर काही मजूर कामावर येऊन पळून जातात .यामुळे सोलापूर जिल्ह्यातील वाहन मालकांना मुकादम व मजुरांनी आजपर्यंत लाखो रुपयांना बुडवले आहे व अशी बुडवणूक केलेली रक्कम कोट्यावधी रुपया पर्यंत गेलेली आहे, प्रसंगी वाहन मालकांना जीव देखील गमावावा लागला आहे, या संपूर्ण गंभीर बाबीवर विचार विनिमय करून ठोस उपाययोजना करण्यासाठी राज्यात फक्त सोलापूर जिल्ह्यात पहिल्यांदाच आशा बैठकीचे आयोजन करण्यात आले असल्याचे विशेष नमूद करण्यात आले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा