Breaking

मंगळवार, १७ जानेवारी, २०२३

विठ्ठलराव शिंदे कारखान्याच्या शेतकऱ्यांचा मांजरी पुणे येथे 'ऊस शेती ज्ञानयाग' प्रशिक्षणात सहभाग...



विठ्ठलराव शिंदे कारखान्याच्या शेतकऱ्यांचा मांजरी पुणे येथे 'ऊस शेती ज्ञानयाग' प्रशिक्षणात सहभाग...


 बेंबळे। प्रतिनिधी/ मुकुंद रामदासी 

         वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मांजरी पुणे येथे आयोजित केलेल्या ऊस शेती ज्ञानयाग या चार दिवसाच्या प्रशिक्षणासाठी विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्यातर्फे शेतकऱ्यांना पाठवण्यात आले असल्याची माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक संतोष डिग्रजे यांनी दिली आहे. 
             वृत्तांत देताना कारखान्याचे ऊस विकास अधिकारी नारायण लगड म्हणाले की कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष आमदार बबनदादा शिंदे यांच्या मार्गदर्श व नियोजनानुसार हा उपक्रम राबवला जात आहे, पारंपारिक पद्धतीने शेती करणे परवडत नाही, नवीन उपलब्ध कृषी तंत्रज्ञानाच्या अत्याधुनिक वेगवेगळ्या प्रयोगाने कमी कष्ट व कमी खर्चात जास्तीत जास्त ऊस उत्पादन घेणे, जमिनीची सुपीकता टिकून ठेवणे, ठिबक सिंचन पद्धतीने पाण्याचा योग्य तेवढाच वापर करणे, ऊस पिकावरील रोग, कीड, मर व तणनाशकाविषयी सखोल अभ्यास करणे व योग्य वेळी योग्य प्रकारच्या रासायनिक घन आणि विद्राव्य खतांच्या मात्रा वापरून भरघोस  ऊस उत्पादन कसे घेता येईल याचा प्रायोगिक अभ्यास करणे इत्यादी विषयी या चार दिवसात वसंतदादा इन्स्टिट्यूटच्या शास्त्रज्ञा मार्फत सखोल मार्गदर्शन केले जाणार आहे. मागील  तीन वर्षापासून कारखान्याने 'उद्दिष्ट 100 टन प्लस 'हा प्रयोग कारखाना कार्यक्षेत्रात राबवण्यास सुरुवात केली असून ऊस पिकाच्या संगोपनाचे 'बांधावर जाऊन मार्गदर्शन' हे अभियान सातत्याने राबवण्यात येत आहे व याचा परिणाम आता दिसून येत असून यावर्षी अनेक ऊस उत्पादकांनी सध्याच्या गळीत हंगामात 100 ते 125 मेट्रिक टन पर्यंत उसाचे उत्पादन घेतले आहे.      
              याप्रसंगी केन मॅनेजर संभाजी थिटे म्हणाले की सध्या कोणत्याही प्रकारचे धान्य भाजीपाला किंवा फळबागा कितीही खर्च करून व काळजीने जोपासल्या तरी त्याची विक्री करताना बाजारभाव हे व्यापारी व दलाल यांचेवर अवलंबून असतात त्यामुळे निश्चित आर्थिक उत्पन्नाचा भरोसा शेतकऱ्यांना कोणीही देत नाही, परंतु ऊस हे सर्वत्र नगदी पैशाचे पीक असून त्याला चांगल्या प्रकारे भावही मिळत आहे तसेच विठ्ठलराव शिंदे  साखर कारखाना गळीतास आलेल्या उसाचे पैसे 11 व्या दिवशी शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा करत आहे .त्यामुळे निश्चित व खात्रीशीर पैशाचे नगदी पीक म्हणून असंख्य शेतकरी ऊस पिकाकडे सध्या जास्तीत जास्त कळलेले दिसून येत आहेत ही वस्तुस्थिती कोणीही ना करू शकत नाही. याप्रसंगी शेतकी अधिकारी सुनील बंडगर, ऊस पुरवठा अधिकारी  बालाजी गीड्डे व इतर नागरिक उपस्थित होते .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा