दूध भेसळखोरांच्या कारवाईसाठी टिळक भोस यांचे आझाद मैदानावर आमरण उपोषण
श्रीगोंदा-नितीन रोही
तालुक्यातील दुधभेसळीच्या गुन्ह्य़ातील सर्व आरोपी अटक करण्यात यावे आणि महाराष्ट्रातील दूध भेसळचे रॅकेट नष्ट करण्याच्या मागणीसाठी संभाजी ब्रिगेडचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष टिळक भोस यांनी आझाद मैदानावर अमरण उपोषण सुरू केले. यावेळी गृह विभागाचे सचिव रवींद्र औटे यांनी या उपोषणाची गांभीर्याने दखल घेत तातडीने सर्व वरिष्ठ पोलीस अधिकारी यांना सूचना देऊन सर्व आरोपी अटक करणेसाठी आदेश दिले असून पोलीस व अन्न-औषध प्रशासनाच्या विभागातील दोषी अधिकाऱ्यांची चौकशी करून कारवाई करण्यात येणार असल्याचे आश्वासन दिल्यानंतर आमरण उपोषण स्थगित करण्यात आले.
तालुक्यात सुरू असलेल्या दूध भेसळीच्या रॅकेटची पाळेमुळे शिरूर, राहुरी, जुन्नर, अकलूज अशा अनेक ठिकाणी पोहचली असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले असून हे रॅकेट राज्यव्यापी कार्यरत असून अनेक राजकीय पदाधिकारी यात सहभागी आहेत. त्यामुळे पोलीस यंत्रणा आणि अन्न औषध प्रशासन सुद्धा दबावात काम करत आहे. या गुन्ह्य़ातील २४ पैकी फक्त १० आरोपी ताब्यात घेण्यात आले असल्याने संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष टिळक भोस यांनी आझाद मैदान येथे अमरण उपोषण सुरू केले होते. या आमरण उपोषनाची दखल घेऊन गृह विभागाचे सचिव रवींद्र औटे यांनी भोस यांना मंत्रालायात चर्चेसाठी बोलावले असता अन्न-औषध प्रशासनाचे सचिव यांशी चर्चा करून गुन्ह्य़ातील आरोपीसोबतच भेसळीचे दूध विकत घेणारे प्लान्टधारक यांना सह आरोपी करणे, राजकीय दबावामुळे श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक समीर अभंग हे आरोपींना अटक करण्यास टाळाटाळ करत असल्याने सदर तपास सीआयडीकडे देण्यात यावा, आर्थिक तडजोडीतुन अनेक आरोपींची नावे कमी करण्यात आली असून पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले हे हेतुपुर्वक दुर्लक्ष करत आहेत. आर्थिक तडजोडीमुळे सदर प्रकरणातील मुख्य आरोपीवर गुन्हे दाखल केले जात नाहीत. तसेच या रॅकेटचे पाळेमुळे राजकीय असल्याने आरोपीना अभय मिळत आहे अशा आशयाच्या बातम्या वर्तमानपत्रात छापून येत असल्याने समाजामध्ये संभ्रम निर्माण होत आहे. सर्व आरोपी हे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असून आमच्या जीवितास धोका निर्माण झाल्यास त्यास श्रीगोंदा पोलीस जबाबदार राहतील अशी मागणी करण्यात आली.
यावेळी गृह विभागाचे सचिव रवींद्र औटे यांनी या विषयात टास्क फोर्स व एस आय टी मार्फत चौकशीची मागणी करुन या संदर्भात सरकारी पातळीवर पोलीस व अन्न व औषध प्रशासन योग्य समन्वय साधून प्रयत्न करू असे आश्वासन दिले. तसेच फरार आरोपीना तात्काळ अटक करण्यासाठी अहमदनगरचे पोलीस अधिक्षक राकेश ओला व कर्जत उप विभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांना सूचना देण्यात आल्या. श्रीगोंदा पोलीस या विषयात हलगर्जीपणा करणार नाहीत. त्याचबरोबर तपासी पोलीस अधिकारी समीर अभंग यांच्या कामात त्रुटी आढळल्यास त्यांवर सुद्धा कारवाई करू असे आश्वासन औटे यांनी दिले असल्याची माहिती टिळक भोस यांनी दिली.यावेळी युवराज पळसकर,गणेश काळे,धनंजय गायकवाड, उपस्थित होते
चौकट
जोपर्यंत दूध भेसळीमधील सर्व आरोपी व रॅकेट उध्वस्त होत नाही तोपर्यत हा लढा थांबणार नाही पोलीस व अन्न औषध प्रशासनाने हलगर्जीपणा केल्यास पुन्हा उपोषण करण्यात येईल असे टिळक भोस यांनी सांगितले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा