वारकऱ्यावर केलेल्या हल्ल्याचा चिपळूण महिला आघाडी तर्फे निषेध
टेंभुर्णीप्रतिनिधी :- वारकऱ्यांच्या वर केलेला हल्ल्याचा निषेध माननीय महिला प्रदेशाध्यक्षा संध्याताई सव्वालके यांच्या आदेशानुसार आळंदी येथे संत ज्ञानेश्वर महाराजांच्या दिंडीमध्ये वारकऱ्यावर पोलीसांन कडून लाठीचार्ज करण्यात आला. अतिशय क्रूर आणि वाईट महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळीमा फासणारी घटना आहे. आपल्या महाराष्ट्र राज्याला हजारो वर्षापूर्वीचे सुसंस्कृत असे एक परंपरा आहे ती परंपरा अबाधित ठेवण्याऐवजी ते नास वण्याचे पाप हे सरकार करत आहे . वारकरी संप्रदायावर तुम्ही हल्ला केला त्याचे उत्तर तुम्हाला नक्की मिळेल.अशा पवित्र ठिकाणी अशा प्रकारे भाविकांनवर अत्याचार करणे त्यांच्या भावना दुखवने खुप चुकीचे आहे ईथुन पुढे अशा घटना हिंदुचत्वादी आपल्या देशामध्ये कुठेही घडू नये याची दखल सरकारने घ्यावी . या घटनेचा निषेध म्हणून आज चिपळूण तालुका काँग्रेसच्या वतीने शांतमय वातावरणात विठ्ठल रुखमाई च्या साक्षीने निषेध करण्यात आला. यावेळी उपस्थित बेसिक काँग्रेसच्या उप जिल्हाध्यक्षा अश्विनीताई भुस्कुटे, महिला तालुकाध्यक्षा निर्मलाताई जाधव,उप तालुकाध्यक्षा वर्षा खटके-पाटील, माजी नगरसेविका सफा गोठे, तालुका सचिव अपूर्वा आयरे, उपशहराध्यक्षा मिरा नारकर आदी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा