योग्य नियोजन केल्यास एकरी शंभर टन ऊस उत्पादन सहज शक्य...
रासायनिक खतांचा अतिवापर टाळावा डॉक्टर संजीव माने,
बेंबळे ।प्रतिनिधी
शेतकऱ्यांनी उसाची लागण केल्यानंतर भरमसाठ रासायनिक खते घालण्यापेक्षा योग्य नियोजन केल्यास एकरी 100 टन ऊस उत्पादन सहज शक्य होऊ शकते असे प्रतिपादन कृषी भूषण डॉक्टर संजीव माने यांनी बेंबळे येथे आमदार बबनराव शिंदे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या ऊस विकास परिषदेत शेतकरी मेळाव्यात बोलताना केले आहे ,अध्यक्षस्थानी विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक संतोष डिग्रजे होते,ऊस भूषण अशोक खोत साखर कारखान्याचे केन मॅनेजर संभाजी थिटे ऊस विकास अधिकारी नारायण लगड तालुका कृषी अधिकारी कदम साहेब तसेच सोमनाथ हुलगे संजय पवार कैलास भोसले मोहन लोकरे गोविंद भोसले आदी प्रमुख मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.
डॉक्टर संजीव माने म्हणाले की मेहनत मशागत व चार ते पाच फूट रुंदीची सरी सोडल्यानंतर प्रक्रिया करून दोन डोळा पद्धतीने दीड ते दोन फूट अंतरावर बेण्याची लागण करावी व बेसल डोस द्यावा. दीड महिन्यानंतर पहिली संजीवनीची तर प्रत्येक वीस दिवसाला पुन्हा तशीच फवारणी करावी रोग नियंत्रण व तणवीरहीत पीक राहील अशी काळजी घ्यावी, योग्य पाण्याचे नियोजन ठिबक सिंचन द्वारे करावे व सर्व खते ठिबक मार्फतच द्यावी. ऊस लहान असताना रेघ मारू नये ,पहिली बांधणी अडीच महिन्यानंतर करावी तर त्यानंतर दीड ते दोन महिन्यांनी मोठ्या बांधणीच्या वेळी शेतामध्ये 60 हजार उस असावे तर ऊस मोठा झाल्यानंतर कारखान्याला तुटून जाताना किमान 45 हजार ऊस उभे असावे, याप्रमाणे नियोजन केल्यास एकरी 100 टन ऊस उत्पादन कोणत्याही प्रकारचा शेतकरी सहजपणे घेऊ शकतो व हा प्रयोग महाराष्ट्रामध्ये सर्वत्र यशस्वी होत आहे असेही डॉक्टर माने यांनी याप्रसंगी सांगितले .
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ऊस भूषण शेतकरी सोमनाथ हुलगे यांनी केले अशोक खोत यांनीही काही अनुभवी मार्गदर्शन केले सूत्रसंचालन नितीन मगर यांनी केले कार्यक्रमास ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा