Breaking

शनिवार, १२ ऑगस्ट, २०२३

मातोश्री वरील शिवसेना नेत्यांची बैठक ईडीच्या कारवायांपासून वाचण्यासाठी ........?



मातोश्री वरील शिवसेना नेत्यांची बैठक ईडीच्या कारवायांपासून वाचण्यासाठी ........?


मुंबई (विशेष प्रतिनिधी) वरळी विधानसभा मतदारसंघातील महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांची मातोश्रीवर आयोजित केलेली शिवसेना नेत्यांची तातडीची बैठक ही वरळी विधानसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांच्या सोबत चर्चेसाठी होती की ईडीच्या र*** वरील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्यांना कारवायांपासून वाचण्यासाठी होती  अशी चर्चा दबक्या आवाजात ऐकण्यास मिळत आहे

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते व राज्यसभेचे खासदार संजय राऊत हे सध्या ईडी मधून जामीनावर आहेत त्यातच मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर या कोविड घोटाळ्यांमधील आरोपांवरून त्यांची काही दिवसापूर्वी आर्थिक गुन्हा अन्वेषण विभागाने चौकशी चालू केली असून त्या संबंधात सर्व कागदपत्रे ईडीने जमा करण्यास सुरुवात केल्याचे सांगण्यात येत आहे तसेच शिवसेनेचे दुसरे नेते व मुंबईचे आमदार रवींद्र वायकर हे देखील ईडीच्या रडारवर आहेत त्याचप्रमाणे शिवसेनेचे नेते व वरळी विधानसभेचे आमदार आदित्य ठाकरे यांच्या जवळच्या नेत्यांची देखील ईडीने चौकशी केली असून या सर्व नेत्यांच्या मागे ईडीचा फेरा लागला असून कोणत्याही क्षणी ईडी या नेत्यांवर चौकशीची कारवाई करीत   मातोश्री पर्यंत पोचली तर काय कारवाई होऊ शकते याचा अंदाज मातोश्रीला आला असल्याचे सांगण्यात येत आहे

वरळी विधानसभा मतदारसंघातील महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांची  मातोश्रीवर आयोजित ही बैठक आत्ताच का तातडीने घेतली असा प्रश्न शिवसेनेच्या अन्य नेत्यांना पडला आहे अजून कोणत्याही निवडणुका जाहीर झालेल्या नाहीत त्यामुळे एवढ्या महत्त्वाच्या तातडीच्या मीटिंग आयोजित करण्यामागे नेमके कोणते कारण आहे असा प्रश्न सर्वसामान्य शिवसैनिकांपासून शिवसेनेच्या . मुंबईपासून राज्यातील पदाधिकाऱ्यांना पडला आहे

मुंबईमध्ये देशातील सर्व विरोधी पक्षांची बैठक 31 ऑगस्ट रोजी आयोजित केली आहे या बैठकीच् यजमानपद हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडे असल्याने देशातील भाजपा नेते यावरून शिवसेनेवर टीका करीत आहेत तसेच एकही दिवस असा जात नाही की भाजपाच्या राज्यातील नेत्यांपासून केंद्रातील नेत्यांपर्यंत तसेच शिंदे गटातील आमदार व खासदार हे देखील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील नेत्यांवर टीकेचे आसूड ओढत आहेत तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री नवाब मलिक यांची दोन महिन्याच्या मुदतीवर ईडीने औषधोपचार घेण्यासाठी सुटका केली आहे 

महाविकास आघाडी मधील माजी मंत्री व राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांची सुटका राष्ट्रवादी काँग्रेस भाजपा बरोबर सत्तेत गेल्याने झाले असल्याची चर्चा राज्यात सर्वत्र चर्चिली जात असताना दुसरीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते ईडीच्या रडारवर असल्याने तसेच भाजप नेतृत्वाला ठाकरे गटाला पर्यायाने मातोश्रीला नामोहरम करण्यासाठी ते ठाकरे गटाच्या नेत्यांची ईडी ची चौकशी लावून त्यांना जेरबंद करण्याची योजना आखत असल्याची कुणकुण मातोश्रीला लागली आहे

 मुंबईतील 31 ऑगस्ट च्या विरोधी पक्षाच्या बैठकीपूर्वी ठाकरे गटाला घेऱ्यात पकडण्यासाठी भाजपाकडून ईडीचा वापर होण्याची शक्यता असल्याने मातोश्रीवर आयोजित केलेली तातडीची बैठक हेच कारण असल्याचे समजते

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा