आदिवासी वस्तीवर जाऊन धुतले विद्यार्थ्यांचे कपडे..
........................................
सहारा सर्वांगीण विकास संस्थेचा उपक्रम.....
श्रीगोंदा-नितीन रोही
आदिवासींची परंपरा वेगळी आहे,यांचे दैवत वेगळे आहेत,ते निसर्गाशी आपले नाते जोडतात,स्त्री-पुरुष समानतेचे बीज यांच्यामध्ये आहे.यांच्याकडे अजूनही आदिमानव,गुन्हेगार म्हणून इतर समाज पाहतो,हा दृष्टीकोन बदलला पाहिजे,तरच 9 ऑगस्ट जागतिक क्रांती दिन म्हणून साजरा करण्यात अर्थ आहे. आणि म्हणून आज लोणी व्यंकनाथ गावातील आदिवासी पारधी वस्तीवरील विद्यार्थी, आणि पालक यांना एकत्र घेऊन कपडे स्वच्छ धुण्यासाठी निरमा आणि रीन साबण दिले आणि कपडे धुण्यास सुरूवात केली.जर या पुढे मुले चांगल्या कपड्यात शाळेत गेले नाही तर स्वतः कपडे धोऊन देणार असेही बोलताना सहारा सर्वांगीण विकास संस्थेचे अध्यक्ष संतोष भोसले म्हणाले तर जे मुले शाळा बाह्य आहेत, जे मुले शाळेत जात नाहीत, ज्या मुलांना शाळेत जाऊन लिहिता वाचता येत नाही अशा मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी आजपासून सुरुवात करनार आहे असे बोलताना सहारा संस्थेचे सचिव छाया भोसले म्हणाल्या.
निरमा आणि साबणाचे सहकार्य ग्रामपंचायत लोणी व्यंकनाथ गावचे तंटामुक्त चे अध्यक्ष ज्ञानदेव माऊली मगर यांनी केले.
9 ऑगस्ट 1994 हा दिवस जागतिक आदिवासी दिन म्हणून जागतिक संयुक्त राष्ट्राने घोषित केला आहे. स्वातंत्र्यपूर्व काळापासून आदिवासी समाज जंगलात राहत होता. जंगलाचं पर्यावरण सांभाळण्याचं काम आदिवासींनी केलं. जंगलाचं रक्षण त्यांनी केलं. परंतु जेव्हा इंग्रज भारतामध्ये आले तेव्हा त्यांनी आदिवासींना जंगलातून हुसकण्याचं पहिलं काम केलं. आदिवासींचे जीवन स्वावलंबी होतं त्यावरच गदा आल्याने आदिवासी परावलंबी होऊ लागले. आदिवासी जंगलाला देव मानतात. जंगलातील डोंगर, झाडे, नदी, दगड यास ते देवासारखे पुजतात. आणि जंगल हेच आपलं जग आहे असं समजतात. इंग्रजांनी मात्र याचा कुठलाही विचार न करता आदिवासींना जंगलातून बाहेर काढल्यामुळे, आदिवासी परावलंबी बनले. पूर्वीपासूनच आदिवासी समाज इतर समाजाच्या तुलनेत अत्यंत मागासलेला आहे. शिक्षण, आरोग्य, रोजगार,स्थैर्य यापासून कोसो दूर आहे. जागतिक पातळीवर आदिवासी समाजाची परिस्थिती बऱ्यापैकी एकसारखिच असल्याने, जगातील बहुतांश देशांना, या जमातीला त्यांचे हक्क मिळावेत, त्यांना इतर समाजाच्या बरोबरीने जगता यावं याची जाणीव झाली. आणि संयुक्त राष्ट्र संघटनेत असलेल्या 192 देशांनी जिनिव्हा येथे एकत्र येऊन विश्व आदिवासी दिन घोषित करण्याचे ठरवले आणि संयुक्त राष्ट्र संघटनेचे सर्व पदाधिकारी 9 ऑगस्ट 1994 ला जिनेव्हा येथे एकत्र आले आणि त्यांनी आदिवासींचा विकास व्हावा, त्यांना त्यांचे हक्क मिळावेत, त्यांच्या मुलांना शिक्षण, आरोग्य, रोजगार मिळावा, याच्यासाठी प्रत्येक देशाने विशेष लक्ष घालावे यासाठी 9 ऑगस्ट हा दिन विश्व आदिवासी दिवस म्हणून घोषित केला.या दिवसापासून या जमातीला मूलभूत सुविधा पुरवण्याकडे लक्ष वेधले गेले, आणि या दिवसापासून अनेक देशांनी आदिवासींसाठी त्यांच्या विकासाचा वेगळा विचार केला. जागतिक स्तरावर या हालचाली फार विलंबाने झाल्या ,मात्र भारत देश स्वतंत्र झाल्यानंतर 26 जानेवारी 1950 ला संविधान अस्तित्वात आले. यात आदिवासींच्या विकासाची भूमिका ठरवून तरतूद करण्यात आली. संविधानात एकूण 22 भाग, 12 अनुसूची व 395 अनुच्छेद आहेत. यातील सर्वाधिक अनुच्छेद आदिवासी समाजाच्या हित रक्षणासाठी आहेत. आदिवासींची एक स्वतंत्र जीवनशैली आहे. रूढी, परंपरा, प्रथा, सामाजिक कायदे, स्वशासन अशी वैशिष्ट्यपूर्ण समाज व्यवस्था होती पण इंग्रजांमुळे त्यांचा जमीन व जंगलावरील हक्क हिरावला गेल्याने स्वयंपूर्ण व्यवस्थेला तडा गेला आणि आदिवासींचे जीवन परावालंबी झाले. त्यामुळे विविध समस्यांना आदिवासींना तोंड द्यावे लागत आहे.पेसा कायद्यामुळे यांना पुन्हा संरक्षण मिळाले आहे. पेसामुळे पूर्ण अधिकार ग्रामसभेला दिले गेले आहेत. यामुळे काही प्रमाणात का होईना आदिवासी समाज स्थिर होऊ लागला आहे. परंतु या समाजाचा म्हणावा तसा विकास अजिबात झाला नाही. त्याचे शिक्षण, आरोग्य,रोजगार, अघोरी प्रथा, जात पंचायती,अंधश्रद्धा यामुळे या समाजाची प्रगती होऊ शकली नाही. पण 9 ऑगस्ट 1994 या जागतिक आदिवासी क्रांती दिनाच्या निमित्ताने या समाजाचा सामाजिक विकास व्हावा म्हणून हा दिवस सर्व आदिवासींनी सणासारखा साजरा करावा. असेही संतोष भोसले म्हणाले
यावेळी कारू भोसले, रेवण भोसले, रीपुस भोसले, अंतुस भोसले, पिणू काळे, माधुरी काळे, तनिषा काळे, कोमल भोसले, भद्रिनाथ काळे हे उपस्थित होते. वेगळी आहे,यांचे दैवत वेगळे आहेत,ते निसर्गाशी आपले नाते जोडतात,स्त्री-पुरुष समानतेचे बीज यांच्यामध्ये आहे.यांच्याकडे अजूनही आदिमानव,गुन्हेगार म्हणून इतर समाज पाहतो,हा दृष्टीकोन बदलला पाहिजे,तरच 9 ऑगस्ट जागतिक क्रांती दिन म्हणून साजरा करण्यात अर्थ आहे. आणि म्हणून आज लोणी व्यंकनाथ गावातील आदिवासी पारधी वस्तीवरील विद्यार्थी, आणि पालक यांना एकत्र घेऊन कपडे स्वच्छ धुण्यासाठी निरमा आणि रीन साबण दिले आणि कपडे धुण्यास सुरूवात केली.जर या पुढे मुले चांगल्या कपड्यात शाळेत गेले नाही तर स्वतः कपडे धोऊन देणार असेही बोलताना सहारा सर्वांगीण विकास संस्थेचे अध्यक्ष संतोष भोसले म्हणाले तर जे मुले शाळा बाह्य आहेत, जे मुले शाळेत जात नाहीत, ज्या मुलांना शाळेत जाऊन लिहिता वाचता येत नाही अशा मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी आजपासून सुरुवात करनार आहे असे बोलताना सहारा संस्थेचे सचिव छाया भोसले म्हणाल्या.
निरमा आणि साबणाचे सहकार्य ग्रामपंचायत लोणी व्यंकनाथ गावचे तंटामुक्त चे अध्यक्ष ज्ञानदेव माऊली मगर यांनी केले.
9 ऑगस्ट 1994 हा दिवस जागतिक आदिवासी दिन म्हणून जागतिक संयुक्त राष्ट्राने घोषित केला आहे. स्वातंत्र्यपूर्व काळापासून आदिवासी समाज जंगलात राहत होता. जंगलाचं पर्यावरण सांभाळण्याचं काम आदिवासींनी केलं. जंगलाचं रक्षण त्यांनी केलं. परंतु जेव्हा इंग्रज भारतामध्ये आले तेव्हा त्यांनी आदिवासींना जंगलातून हुसकण्याचं पहिलं काम केलं. आदिवासींचे जीवन स्वावलंबी होतं त्यावरच गदा आल्याने आदिवासी परावलंबी होऊ लागले. आदिवासी जंगलाला देव मानतात. जंगलातील डोंगर, झाडे, नदी, दगड यास ते देवासारखे पुजतात. आणि जंगल हेच आपलं जग आहे असं समजतात. इंग्रजांनी मात्र याचा कुठलाही विचार न करता आदिवासींना जंगलातून बाहेर काढल्यामुळे, आदिवासी परावलंबी बनले. पूर्वीपासूनच आदिवासी समाज इतर समाजाच्या तुलनेत अत्यंत मागासलेला आहे. शिक्षण, आरोग्य, रोजगार,स्थैर्य यापासून कोसो दूर आहे. जागतिक पातळीवर आदिवासी समाजाची परिस्थिती बऱ्यापैकी एकसारखिच असल्याने, जगातील बहुतांश देशांना, या जमातीला त्यांचे हक्क मिळावेत, त्यांना इतर समाजाच्या बरोबरीने जगता यावं याची जाणीव झाली. आणि संयुक्त राष्ट्र संघटनेत असलेल्या 192 देशांनी जिनिव्हा येथे एकत्र येऊन विश्व आदिवासी दिन घोषित करण्याचे ठरवले आणि संयुक्त राष्ट्र संघटनेचे सर्व पदाधिकारी 9 ऑगस्ट 1994 ला जिनेव्हा येथे एकत्र आले आणि त्यांनी आदिवासींचा विकास व्हावा, त्यांना त्यांचे हक्क मिळावेत, त्यांच्या मुलांना शिक्षण, आरोग्य, रोजगार मिळावा, याच्यासाठी प्रत्येक देशाने विशेष लक्ष घालावे यासाठी 9 ऑगस्ट हा दिन विश्व आदिवासी दिवस म्हणून घोषित केला.या दिवसापासून या जमातीला मूलभूत सुविधा पुरवण्याकडे लक्ष वेधले गेले, आणि या दिवसापासून अनेक देशांनी आदिवासींसाठी त्यांच्या विकासाचा वेगळा विचार केला. जागतिक स्तरावर या हालचाली फार विलंबाने झाल्या ,मात्र भारत देश स्वतंत्र झाल्यानंतर 26 जानेवारी 1950 ला संविधान अस्तित्वात आले. यात आदिवासींच्या विकासाची भूमिका ठरवून तरतूद करण्यात आली. संविधानात एकूण 22 भाग, 12 अनुसूची व 395 अनुच्छेद आहेत. यातील सर्वाधिक अनुच्छेद आदिवासी समाजाच्या हित रक्षणासाठी आहेत. आदिवासींची एक स्वतंत्र जीवनशैली आहे. रूढी, परंपरा, प्रथा, सामाजिक कायदे, स्वशासन अशी वैशिष्ट्यपूर्ण समाज व्यवस्था होती पण इंग्रजांमुळे त्यांचा जमीन व जंगलावरील हक्क हिरावला गेल्याने स्वयंपूर्ण व्यवस्थेला तडा गेला आणि आदिवासींचे जीवन परावालंबी झाले. त्यामुळे विविध समस्यांना आदिवासींना तोंड द्यावे लागत आहे.पेसा कायद्यामुळे यांना पुन्हा संरक्षण मिळाले आहे. पेसामुळे पूर्ण अधिकार ग्रामसभेला दिले गेले आहेत. यामुळे काही प्रमाणात का होईना आदिवासी समाज स्थिर होऊ लागला आहे. परंतु या समाजाचा म्हणावा तसा विकास अजिबात झाला नाही. त्याचे शिक्षण, आरोग्य,रोजगार, अघोरी प्रथा, जात पंचायती,अंधश्रद्धा यामुळे या समाजाची प्रगती होऊ शकली नाही. पण 9 ऑगस्ट 1994 या जागतिक आदिवासी क्रांती दिनाच्या निमित्ताने या समाजाचा सामाजिक विकास व्हावा म्हणून हा दिवस सर्व आदिवासींनी सणासारखा साजरा करावा. असेही संतोष भोसले म्हणाले
यावेळी कारू भोसले, रेवण भोसले, रीपुस भोसले, अंतुस भोसले, पिणू काळे, माधुरी काळे, तनिषा काळे, कोमल भोसले, भद्रिनाथ काळे हे उपस्थित होते. फोटो,
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा