शिंदे फडणवीस व पवार सरकार मधील अखेर झेंडावंदनाचे ठरले तूर्तास पालकमंत्री पदाचा वाद झेंडावंदनावरून टाळला?
मुंबई( मिलिंद माने). राज्यातील शिंदे फडणवीस व पवार सरकारमधील पालकमंत्री पदाचा वाद स्वातंत्र्य दिनाच्या झेंडावंदनावरून तूर्तास टाळल्याचे राज्याचे अवर सचिव मिलिंद हरदास यांनी काढलेल्या परिपत्रकावरून स्पष्ट होत आहे
राज्यातील शिंदे फडणवीस व पवार सरकारमधील मंत्रिमंडळ विस्तार पुन्हा एकदा 15 ऑगस्ट पूर्वी होणार असे संकेत मिळत असताना पालकमंत्री पदावरून चाललेले कलगीतुरे थांबवण्यासाठी मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर गेला असून भारतीय स्वातंत्र्य दिनाचा 76 वा वर्धापन दिनानिमित्त कोणत्या मंत्र्याने कोणत्या जिल्ह्यात झेंडावंदन करावे याबाबत राज्यातील सरकारमधील मंत्र्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर चढाओढ चालू होती राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री पद मिळणार व ते पुण्याला आपला स्वातंत्र्य दिनाचा झेंडावंदनाचा कार्यक्रम पार पाडणार तर रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून तटकरे गोगावले मधील वाद मागील चार वर्षापासून सर्वश्रुत असताना पुन्हा एकदा आदिती तटकरे या कॅबिनेट मंत्री झाल्याने पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला होता या वादाला स्वातंत्र्य दिनाच्या झेंडावंदनाच्या कार्यक्रमाला गालबोट लागू नये यासाठी आदिती तटकरे यांना रायगड ऐवजी पालघर जिल्ह्यात झेंडावंदन प्रशासनाने सांगितले आहे
भारतीय स्वातंत्र्य दिनाचा 76 वा वर्धापन दिनानिमित्त 15 ऑगस्ट रोजी कोणत्या मंत्र्याने कोणत्या जिल्ह्यात झेंडावंदन करावे याबाबतच परिपत्रक राज्याचे आवर सचिव मिलिंद हरदास यांनी आज जाहीर केले आहे त्यानुसार; देवेंद्र फडणवीस नागपूर, अजित पवार कोल्हापूर, छगन भुजबळ, अमरावती ,सुधीर मुनगंटीवार चंद्रपूर, चंद्रकांत दादा पाटील पुणे, दिलीप वळसे पाटील वाशिम, राधाकृष्ण विखे पाटील अहमदनगर ,गिरीश महाजन नाशिक, दादा भुसे धुळे, गुलाबराव पाटील जळगाव ,रवींद्र चव्हाण ठाणे ,हसन मुश्रीफ सोलापूर, दीपक केसरकर सिंधुदुर्ग ,उदय सामंत रत्नागिरी ,अतुल सावे परभणी, संदिपान भुमरे औरंगाबाद ,सुरेश खाडे सांगली, विजयकुमार गावित नंदुरबार ,तानाजी सावंत उस्मानाबाद ,शंभुराज देसाई सातारा ,अब्दुल सत्तार जालना ,संजय राठोड यवतमाळ, धनंजय मुंडे बीड, धर्मराव बाबा आत्राम गडचिरोली, मंगल प्रभात लोढा मुंबई उपनगर, संजय बनसोडे लातूर ,अनिल पाटील बुलढाणा ,अदिती तटकरे पालघर, तर रायगड जिल्ह्यासाठी रायगडचे जिल्हाधिकारी योगेश म्हसे हे झेंडावंदन करणार आहेत तर हिंगोली वर्धा गोंदिया भंडारा अकोला नांदेड या जिल्ह्यांसाठी संबंधित जिल्हाधिकारी स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी झेंडावंदन करतील असे परिपत्रक राज्य शासनाचे अवर सचिव मिलिंद हरदास यांनी काढलेल्या परिपत्रकात स्पष्ट केले आहे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा