Breaking

रविवार, ३ सप्टेंबर, २०२३

आरक्षण न मिळाल्यास पुढील पिढी क्षमा करणार नाही....... प्रा. भक्तराज लोंढे



आरक्षण न मिळाल्यास पुढील पिढी क्षमा करणार नाही....... प्रा. भक्तराज लोंढे


 बेंबळे। प्रतिनिधी।              
           जालना येथे मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी शांतपणे उपोषण करण्यात येत होते आणि ते योग्यही आहे कारण 50 टक्के आरक्षण मराठा समाजाला न मिळाल्यामुळे सध्य पिढीचे तर वाटोळ होऊ लागले आहेच पण आरक्षण न मिळाल्यास आपली भावी पिढी देखील आपल्याला क्षमा करणार नाही, यापूर्वी आरक्षण मिळावे म्हणून मराठा समाजाचे 58 मोर्चे अतिशय शांतपणे निघाले होते पण असं काय झालं की जेणेकरून जालना येथे उपोषणकर्त्यावर हल्ला करण्यात आला... शासनाने केलेले हे कृत्य अयोग्य असून या निषेदार्थ आज आपण महाराष्ट्र बंदला बेंबळे कर नागरिक उत्स्फूर्तपणे साथ देत आहोत असे प्रतिपादन प्रा. भक्तराज लोंढे यांनी याप्रसंगी केले.

                  बेंबळे या बारा हजार लोकसंख्येच्या गावातील बाजारपेठा व सर्व व्यवहार रविवारी(दि.३रोजी) बंद ठेवण्यात आले व पोलिसांच्या जालन्यातील अमानुष कृत्यांचा निषेध करण्यात आला. यानिमित्त युवक ,प्राध्यापक ,शिक्षक, नागरिक व व्यावसायिक यांनी  शांतपणे गावातून मूक मोर्चा काढला, छत्रपती शिवाजी चौकामध्ये हा मोर्चा थांबवण्यात आला .या ठिकाणी प्रा. संतोष शिंदे प्रा. मोहन भोसले यांनीही समयोचित विचार व्यक्त केले . अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यापाऱ्यांनी या बंदला शंभर टक्के पाठिंबा दिला.
           याप्रसंगी प्रा. भक्तराज लोंढे प्रा. मोहन भोसले प्रा. संतोष शिंदे सोमा तात्या हुलगे जयवंत भोसले, गजानन पताळे साधू पवार दादा भोसले समाधान आवताडे सिद्धेश्वर शिंदे गणेश भांगे ज्योतीराम नागटिळक वैभव पवार प्रशांत जगदाळे लक्ष्मण भोसले, अभयसिंह भोसले दिनकर भोसले शंभू पाटील किशोर कदम क्रांतिसिंह भोसले महेश रामदासी यांचे सह अनेक  युवक कार्यकर्ते उपस्थित होते.
 टेंभुर्णीचे पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांच्या अधिपत्याखाली बीट कॉन्स्टेबल बीएस हजारे अशपाक शेख सलीम पठाण तुकाराम माने-देशमुख व पोलीस पाटील बिभीषण कीर्ते यांनी  बंदोबस्त चोख ठेवला होता.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा