उजनी धरणातून कालवा, सीना माढा व दहिगाव सिंचन योजनेतून पाणी सोडण्यात येणार ....
आमदार बबनदादा शिंदे
बेंबळे।प्रतिनिधी। फोटो
उजनी धरणातून सीनामाढा आणि दहिगाव सिंचन योजनेचे आवर्तन सोमवारी, 2 ऑक्टोबर पासून सुरु होणार असून पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी 3 ऑक्टोबर पासून उजनीच्या कालव्यात पाणी सोडण्यात येणार असल्याची माहिती आमदार बबनदादा शिंदे यांनी दिलेली आहे.
सविस्तर वृत्तांत असा की उजनी धरणात सध्या 33 हजार क्युसेक्स ने पाणी येत असून पाणीसाठा 43 टक्के झालेला आहे व यामध्ये दिवसेंदिवस वाढत होत आहे ही समाधानाची बाब आहे. सोमवारी २ ऑक्टोबर पासून सीना माढा सिंचन योजना व करमाळा तालुक्यातील दहिगाव सिंचन योजना या मधून अनुक्रमे 159 क्युसेक्स व ८५ क्युसेक्स पाणी आवर्तन सोडण्यात येणार आहे. तसेच मंगळवारी 3 ऑक्टोबर पासून नागरिकांना पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी उजनीच्या मुख्य कालव्यातून 2 हजार 500 क्युसेक्स पाणी सोडण्यात येणार असून करकंब मधील पाण्याचा स्टोरेज टॅंक भरून घेण्यात येणार आहे ज्यामुळे करकंब शहराचा पाणीपुरवठा सुरळीत चालेल, तसेच कालव्यातील पाण्याने आष्टी तलाव भरून घेण्यात येणार आहे व या तलावातून आष्टी, बाभळगाव सहित माढा, बावी व इतर आठ गावातील पिण्यासाठी पाणी टंचाई दूर करण्यात येणार आहे असेही आमदार बबनदादा शिंदे यांनी आवर्जून सांगितले. एकंदरीत दोन व तीन ऑक्टोबर पासून कालवा, सीना माढा व दहीगाव सिंचन योजनेतून उजनी धरणाचे पाणीसोडणे सुरू होणार आहे हे निश्चित.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा