दत्तात्रय ढवळे-पाटील यांनी दिला आपल्या पदाचा राजीनामा
टेंभुर्णी प्रतिनिधी
भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रय ढवळे पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे याबाबत समर्थन दिले आहे.
यावेळी ते म्हणाले की केंद्रात आणि राज्यात भारतीय जनता पार्टीचे वर्चस्व असताना मराठा समाजाला जाणून बुजून डावलण्याचे काम हे शासन करत आहे, तर मग यांची पदे घेऊन आपण काय करायचं आपल्या मुलाबाळांच्या भवितव्यासाठी जर विचार केला, तर मनोज जरांगे पाटील आज सहा दिवस झाले अन्न पाण्या वाचून आरक्षण मिळावे म्हणून ते उपोषणास बसले आहेत. त्यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत चाललेली आहे. असे असताना आपण या पदावर मिरवायचे हे योग्य नाही, मराठा समाजापेक्षा कोणतेच पद मोठे नाही, म्हणून या पदाचा मी जाहीर राजीनामा देत आहे असेही त्यांनी संबोधले. यावेळी सर्वांनी घोषणा दिल्या. अनेक जण पद मिळवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे प्रयत्न करून आपल्याला कशी ती बहाल करता येतील याचा विचार करत असताना एकीकडे दत्तात्रय ढवळे यांच्यासारख्या युवकांनी या पदाचा त्याग करून आंदोलनात सहभागी होताना दिसत आहे. त्यामुळे शासनाने या गोष्टीचा जरूर विचार करावा आणि ताबडतोब मराठ्यांना आरक्षण घोषित करावे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा