उजनी धरणातून 4000 क्युसेक्स पाणी भीमा नदीत सोडण्यास प्रारंभ ...
बेंबळे। प्रतिनिधी फोटो
गुरुवार दिनांक 23 नोव्हेंबर रोजी असलेल्या कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपूर ला येणाऱ्या भाविकांसाठी उजनी धरणातून भीमा नदीत शनिवारी 18 नोव्हेंबर रोजी रात्री दहा वाजल्यापासून चार हजार क्युसेक्स विसर्गाने पाणी सोडण्यास प्रारंभ झाला असल्याची माहिती अधीक्षक अभियंता धिरज साळे यांनी दिली आहे. अधिक माहिती देताना उजनी धरण नियंत्रण विभाग कनिष्ठ अभियंता प्रशांत माने म्हणाले की हे पाणी पंढरपूरच्या कार्तिकी एकादशी साठी सोडण्यात येत असून किमान 22 तारखेपर्यंत नदीत पाणी विसर्ग चालू राहणार आहे, या चार दिवसात अंदाजे दीड
टी एम सी पाणी नदी प्रवाहात सोडले जाईल.
सध्या धरणात 43. 54 टक्के पाणी असून 87 टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे. कालव्यातून 2700 क्युसेक्स ,बोगदा 900 क्युसेक्स सिनामाढा 333 क्युसेक्स व दहीगाव 120 क्युसेक्स असा
शेतीसाठी पाण्याचा विसर्ग जलाशयातून चालू आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा