अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे त्वरित पंचनामे होउन भरपाई मिळावी।।
ंं आमदार बबनदादा शिंदे
बेंबळे । प्रतिनिधी
मागील तीन दिवसापासून सोलापूर जिल्ह्यात व माढा तालुक्यात होत असलेल्या गैरहंगामी अवकाळी पावसामुळे द्राक्ष, डाळिंब, पेरू, कांदा, टोमॅटो अशा फळबागा व पिकांचे अतोनात नुकसान झाले असून त्यांचे तातडीने पंचनामे व्हावेत व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी आमदार बबनदादा शिंदे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे।
वृत्तांत असा की 28,29,व30 नोव्हेंबर पासून माढा तालुक्यात गैरहंगामी अवकाळी पावसाने थैमान घातले आहे; त्यामुळे अनेक भागातील द्राक्ष, डाळिंब ,कांदा, टोमॅटो ,आदी पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे, अनेक भागातील वीज पुरवठा बंद पडला आहे, उसाच्या तोडी थांबल्या आहेत तर दळणवळणात अडथळे निर्माण झालेत.माढा तालुक्यात टेंभुर्णी मंडल विभागात 25 मिलिमीटर, लऊळ 32 मिलिमीटर, रोपळे 12 मिलिमीटर ,कुर्डूवाडी 12.6 मिलिमीटर, मोडनिंब 25 मिलिमीटर, रांजणी 17 मिलिमीटर व म्हैसगाव 32 मिलिमीटर अशा पावसाची नोंद झालेली आहे. मोडनिंब ,म्हैसगाव, टेंभुर्णी, या विभागात शेती क्षेत्रातील द्राक्ष पिकांचा फुलोरा झडून गेला आहे तसेच कांदा व टोमॅटो ही नवीन लागण झालेली व पक्व अवस्थेत आलेली पिके जमिनीवर लोळून गेली आहेत, विशेष म्हणजे म्हैसगाव मंडल विभागातील मानेगाव परिसरामध्ये द्राक्ष बागांचे क्षेत्र जास्त आहे व अवकाळी मुळे या भागातही जास्त नुकसान झाले आहे , या नुकसानीमुळे शेतकरी प्रचंड हादरून गेला आहे.तरी यांचे त्वरित पंचनामे होऊन शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई मिळावी अशी आग्रही मागणी आमदार बबनदादा शिंदे यांनी केली आहे.
चौकट,,,
माढा तालुका महसूल विभाग,कृषी विभाग व गटविकास अधिकारी व विभागीय कर्मचारी हे एकत्रित समन्वयाने तातडीने नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करून जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल सादर करणार आहेत
.......विनोद रणवरे; तहसीलदार माढा
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा