दोन लाख रुपयासाठी सासरच्या माणसाकडून विवाहित महिला व तिच्या बाळाला जीवे मारण्याची धमकी ,
पती सासू सासरा व नणंद यांचे विरुद्ध टेंभुर्णी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल...
..बेंबळे व आलेगाव परिसरात चर्चेचा विषय ...
बेंबळे । प्रतिनिधी
माहेरून दोन लाख रुपये आण म्हणून विवाहित महिलेचा शारीरिक मानसिक छळ केला म्हणून तिचा पती सासू-सासरा व नणंद यांचे विरुद्ध टेंभुर्णी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून यामुळे भोसलेवाडी-बेंबळे व आलेगाव भागात एकच चर्चा सुरू आहे .
वृत्तांत असा की भोसलेवाडी- बेंबळे येथील श्रीमंत सौदागर भोसले यांची मुलगी अश्विनी हिचा आलेगाव बुद्रुक तालुका माढा येथील आप्पासाहेब बाळासाहेब पाटील यांच्याशी 22 जानेवारी 2018 रोजी विवाह झाला होता.अश्विनीच्या आई-वडिलांनी लग्नात सर्व प्रकारचा मानपान करणी- धरणी करून हिंदू रीतीरीवाजाप्रमाणे लग्न सोहळा साजरा केला होता. विवाहानंतर थोड्याच दिवसात अश्विनीचा, तू माहेर हुन दोन लाख रुपये आण म्हणून मारहाण करणे, शारीरिक व मानसिक छळ करणे या कारणावरून पती आप्पासाहेब बाळासाहेब पाटील सासरा बाळासाहेब दादासाहेब पाटील, सासू जयश्री बाळासाहेब पाटील, नणंद सोनाली अजित घोगरे( रा.बावडा तालुका इंदापूर) व सावत्र सासू रंजना बाळासाहेब पाटील (सध्या मयत) यांचे विरुद्ध 3 सप्टेंबर 19 रोजी टेंभुर्णी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल केला होता, याची केस माढा न्यायालयात चालू असतानाच अश्विनीचा पती सासू-सासरे नणंद भोसलेवाडी-बेंबळे येथे घरी येऊन आम्ही तुमच्या मुलीला यापुढे कसलाही त्रास देणार नाही व अश्विनी तू नांदण्यास चल म्हणून सर्वांना विनंती व गयावया करत होते, अखेर माझे वडील ,चुलते व इतर पाहुण्यांनी समजावून सांगितल्यानंतर मार्च 2021 मध्ये मी पुन्हा सासरी आलेगाव येथे नांदण्यात आले. त्यानंतर ऑगस्ट 21 पासून मला गरोदरपणाची जाणीव व त्रास सुरू झाला व नंतर 31 मार्च 20 22 रोजी मला एक मुलगा झाला. त्यानंतर माढा न्यायालयात मी आमची तडजोड झाली आहे व मला आता सासरी कसलाही त्रास नाही असे लेखी देऊन व तोंडी, सांगितल्यानंतर 5 ऑगस्ट 22 रोजी पूर्वीच्या तक्रारी मधील माझे पती सासू-सासरे नणंद यांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली.
परंतु त्यानंतर थोड्या काळातच सासरच्या मंडळींनी पुन्हा ऑक्टोबर 22 पासून माझ्या पतीसह सर्वांनीच माहेरून दोन लाख रुपये घेऊन ये म्हणून मला मारहाण करणे, शिवीगाळ, दमदाटी ,उपाशी ठेवणे ,शारीरिक व मानसिक त्रास देणे तसेच मला व माझ्या बाळाला आम्ही केव्हाही जीवे मारू अशा धमक्यावर धमक्या देण्यास सुरुवात केली. हा प्रकार मी माझ्या माहेरी कळवला असता माझे वडील व चुलते यांनी आलेगाव येथे येऊन तुमचं व्यवस्थित चालू असताना आमच्या मुलीला निष्करण त्रास देऊ नका म्हणून सासरच्या सर्वांना विनंती केली व समजावून सांगितले परंतु त्यानंतर देखील या सासरच्या मंडळी मध्ये काहीही फरक पडला नाही व अखेर पाच मे 2023 रोजी मला पुन्हा भोसलेवाडी बेंबळे येथे माझ्या पतीने माहेरी आणून सोडले व ही वेडी आहे व दोन लाख रुपये घेऊनच तू परत ये असे दमदाटी देऊन सांगितले. त्यानंतर देखील माझ्या माहेरच्यांनी अनेक वेळा आलेगावला जाऊन सासरच्या सर्व मंडळींची मनधरणी केली परंतु त्यांचे मध्ये कोणताही फरक पडलेला दिसला नाही म्हणून टेंभुर्णी पोलीस स्टेशन मध्ये 7 डिसेंबर 23 रोजी पुन्हा गुन्हा दाखल करण्यात येत आहे, याबाबत अश्विनी चे पती सासू-सासरे व नणंद यांचे विरुद्ध 498-अ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून टेंभुर्णीचे पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांचे मार्गदर्शन व नियोजनाप्रमाणे कॉन्स्टेबल अश्फाक शेख अधिक तपास करत आहेत. या घटनेमुळे भोसलेवाडी बेंबळे व आलेगाव परिसरात विवाहितेला होणाऱ्या त्रासाबद्दल चर्चेचा विषय झालेला आहे .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा