Breaking

रविवार, २५ फेब्रुवारी, २०२४

कर्मकांडाकडे लक्ष न देता माणुसकीकडे लक्ष दिले पाहिजे - आ रोहित पवार अरण येथे संत सावता माळी महाराज यांच्या भक्तासाठी भक्तनिवासाचे भूमिपूजन


कर्मकांडाकडे लक्ष न देता माणुसकीकडे लक्ष दिले पाहिजे - आ रोहित पवार 


अरण येथे संत सावता माळी महाराज यांच्या भक्तासाठी भक्तनिवासाचे भूमिपूजन


टेंभूर्णी (प्रतिनिधी):- कर्मकांडाकडे लक्ष न देता माणुसकीकडे लक्ष दिले पाहिजे महाराष्ट्र हि संतांची भूमी आहे संतांनी भक्तीचा मार्ग दाखविला आहे. राज्यकर्त्यामुळे विकास होत नसून सर्वसामान्य माणसं, संत व संताच्या विचाराने विकास होत असतो असे कर्जत जामखेड चे आमदर रोहित पवार म्हणाले.
ते संत सावता माळी महाराज यांच्या भक्तासाठी अरण (ता.माढा) येथे भक्तनिवासाचे भूमिपूजन समारंभ प्रसंगी बोलत होते.

सदर कार्यक्रम राजेंद्र पवार, सूनंदाताई पवार, ह भ प तात्या अनारसे महाराज, ह भ प रमेश वसेकर महाराज यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
वसेकर महाराज परिवाराच्या वतीने कांदा, मुळा,भाजी देवून आ रोहित पवार यांचा सत्कार करण्यात आला.

पुढे बोलताना आ रोहित पवार म्हणाले तहानलेला घरा जवळ आला तर पाणी देणे, भुकेलेल्याना अन्न देणे ही संतांनी दिलेली शिकवण व परंपरा आहे. वारी मध्ये कोणताही भेदभाव न मानता फक्त विठूराया स्मरण घेवून वारकरी येत असतो.अडचणी आल्या म्हणून देवाकडे न जाता अडचणी च्या काळात लढण्याची प्रेरणा मिळते म्हणून मी पंढरपूरच्या पांडूरांगला येतो.
आपण कोणत्या कोणाच्या घरात जन्माला येतो हे आपल्या हातात नसते, जातीभेद न मानता महापुरुषांनचे कार्य अंगीकारून त्यांचे विचार समजा पर्यंत पोहोचले पाहिजेत. म्हणून आज या भक्त निवासाचे भूमिपूजन होत आहे.
हे भक्त निवास मी करीत नसून मी फक्त माध्यम आहे कुणीतरी माझ्याकडून करून घेत आहे.
भक्त निवासाची होणारी वास्तू ही माझी नसून लोकांची आहे.
लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केंद्र सरकारने आनेक भारतरत्न दिले की काय असे वाटते. महापुरुषांना भारतरत्न पुरस्कार दिले पाहिजे होते. परंतु केन्द्र सरकारला ते कळाले नाही. मध्यंतरी अनेक अडचणी आल्या परंतु तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने मी बलाढ्य शक्ती विरूध्द लढू शकलो. येत्या काळामध्ये तुमच्या सर्वांच्या सहकार्याने सुराज्य तयार करायचे आहे.

रमेश वसेकर महाराज म्हणाले गेली २५ वर्ष मी संत सावता महाराज यांचे कार्य करीत आहे. या काळात अनेक आमदार, खासदार पाहिले परंतु आ रोहित पवार यांच्या सारखे प्रेमळ व मनमिळाऊ आमदार पहिल्यांदा पाहत आहे. गेल्या वर्षी या ठिकाणी वारकरी भक्तीध्वज उभा केला होता आणि आत्ता याच ठिकाणी भक्त निवास होत आहे असे सांगितले व 
संत सावता महाराज यांचे भजन घेवून सर्व वातावरण भक्तिमय केले. 

प्रास्ताविक विशाल म्हेत्रे यांनी केले.
यावेळी अभिजित पाटील, शिवाजीराजे कांबळे, लक्ष्मण हाके,नामदेव राउत, मनोहर रासकर, संजय कलमंडे, दादासाहेब अनारसे, हरिभाऊ बेडेकर, पंढरीनाथ गोरे यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी राजेंद्र पवार, विठ्ठल सह. साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील, सुभाष गुळवे, मागासवर्ग आयोगाचे माजी सदस्य लक्ष्मण हाके, रमेश बारस्कर, रा.कॉ. शरद पवार पक्षाचे तालुका अध्यक्ष भाऊसाहेब महाडिक, बाळासाहेब पाटील, संजय पाटील घाटनेकर, भारत शिंदे, बाळासाहेब ढेकणे, अड संजय पाटील, प्रभाताई ताकतोडे, अतुल क्षीरसागर, दत्तात्रय अनारसे, जगताप महाराज, गाडे महाराज, डॉ गोरे, बाळासाहेब सपकाळ, रमेश गिरमे, अनिल पिसे, प्रशांत राळेभात, शरद शिंदे, सावता हजारे सह संत सावता महाराज भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.


चौकट
मराठा आरक्षणासाठी आंदोलन करीत असलेले मनोज जरांगे-पाटील हे शरद पवार यांच्या सूचनेप्रमाणे आंदोलन करीत आहेत अशी टीका विरोधक करीत आहेत. परंतु आमदार रोहित पवार यांनी ओबीसी माळी समाजाचे संत सावता माळी महाराज यांच्या भक्तांसाठी भक्तनिवास बांधण्याचा शुभारंभ केल्याने माळी समाज बांधव व सर्व सावता महाराज भक्तगणाचा आनंद द्विगुणित झाला आहे. नेता जातीचा असून उपयोग नाही, नेता हा कर्तुत्वान असावा लागतो अशी प्रतिक्रिया माळी समाज बांधवानी बोलून दाखविली.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा