Breaking

मंगळवार, २७ फेब्रुवारी, २०२४

अकरा ते वीस फेब्रुवारी दरम्यानचे 47 कोटी रू.ऊस बिल शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा... आमदार बबनदादा शिंदे*



अकरा ते वीस फेब्रुवारी दरम्यानचे 47 कोटी रू.ऊस बिल शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा...  आमदार बबनदादा शिंदे*



*केंद्र शासनाने 'जूस टू इथेनॉल '  निर्मितीस बंदी केल्यामुळे साखर कारखाने अडचणीत....*
*कार्यक्षेत्रातील संपूर्ण उसाचे गाळप झाल्याशिवाय कारखाने बंद होणार नाहीत....*
*शिंदे कारखान्याच्या दोन्ही युनिटमध्ये 19 लाख मेट्रिक टन गाळप...*




टेंभुर्णी। प्रतिनिधी                     फोटो


              विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे युनिट नं.1 पिंपळनेर व युनिट नं.2 करकंब या कारखान्याचा सन 2023-24 गळीत हंगाम यशस्वीरित्या चालू असून या दोन्ही कारखान्याचे कार्यक्षेत्रातील सभासद, ऊस पुरवठादार शेतकरी यांचे नोंदलेल्या संपूर्ण ऊसाचे गाळप निश्चितपणे केले जाणार आहे . दरम्यान केंद्र शासनाचे ज्यूस टू इथेनॉल उत्पादन बंदीचे आदेशामुळे   पिंपळनेर युनिट नंबर एक कडे प्रतिदिन 3000 मॅट्रिक टन व करकंब युनिट नंबर दोन कडे प्रतिदिन पाचश मेट्रिक टन असे एकूण प्रतिदिन तीन हजार पाचशे मीटर टन ऊस गाळप कमी होत आहे .प्रतिदिन ऊस गाळप कमी होत असल्यामुळे गाळपाचे दिवस वाढणार आहेत व त्यामुळे गणित हंगाम लावणीवर पाडण्याची शक्यता जास्त आहे ,तसेच  मागील 2023 च्या पावसाळ्यात उशिरा पण  चांगल्यापैकी पाऊस पडल्यामुळे प्रत्येक ठिकाणी उसाच्या वजनात बऱ्याच प्रमाणावर वाढ झालेली दिसून येत आहे,  त्यामुळे मागील एक महिन्यापासुन गळीतास  येणाऱ्या उसाचे हेक्टरी वजन वाढत  असल्याचे दिसून येत आहे व त्यामुळे ऊस गाळपास देखील विलंब होत आहे, शासनाच्या ज्यूस टू इथेनॉल बंदी धोरणामुळे गळीत हंगाम तर लांबणार आहेच परंतु कारखान्याचे देखील नुकसान होत आहे ही सर्व वस्तुस्थिती  नाकारता येणार नाही तरी   देखील  कार्यक्षेत्रातील सर्व शेतकऱ्याचा ऊस गाळप झाल्याशिवाय  दोन्ही कारखाने बंद होणार नाहीत यासाठी कदाचित मार्च अखेर किंवा एप्रिलच्या दहा ते बारा तारखेपर्यंत कारखाने चालले तरी प्रसंगी तोटा सहन करून आम आम्ही कारखाने   निश्चित चालवणार आहोत असे ठाम ग्वाही आमदार बबनदादा शिंदे यांनी दिली आहे. 
             विठ्ठलराव शिंदे साखर कारखाना पिंपळनेर युनिटमध्ये चालू २०२३-२४ हंगामात आज अखेर 14 लाख तीस हजार 681   मेट्रिक टन तर युनिट नंबर दोन करकंब येथे ४ लाख९७हजार४०० टन असे एकूण 19 लाख 28 हजार 321 मेट्रिक टन उसाचे  आज पर्यंत गाळप झालेले आहे .
             या हंगामात 11 ते 20 फेब्रुवारी 24 अखेर गाळप झालेल्या उसाच्या अनुदान सह प्रति टन 2800 रुपये प्रमाणे एकूण 47 कोटी 67 लाख रुपये ऊस बिल शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले असल्याचे   यावेळी  आमदार बबनदादा शिंदे यांनी सांगितले. ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी कोणत्याही प्रकारची घाई  करू नये तसेच नियमानुसार प्रत्येक दहा दिवसाचे बिल देखील वाढीव अन्नदानासहित शेतकऱ्यांना दिले जात आहे व भविष्यात देखील देण्यात येईल याबद्दल निश्चित रहावे असेही दादांनी यावेळेस सांगितले. वाढीव अनुदानासहित आजपर्यंत कारखान्याने 16 जानेवारी ते 31 जानेवारीपर्यंत गलितास आलेल्या उसाला 2750 प्रमाणे, एक ते  29 फेब्रुवारी दरम्यान गळीतास येणाऱ्या उसाला प्रति टन 2800 रुपये प्रमाणे तर एक मार्चपासून पुढे गळीतास येणाऱ्या उसाला 2850 प्रमाणे उत्तेजनार्थ वाढीव ऊस दर निश्चित देण्यात येणार आहे. 
दोन्ही कारखान्यात मिळून चालू हंगामात किमान 25 ते 26 लाख मेट्रिक टन उसाचे गाळप होईल असा सध्याचा अंदाज  असल्याचे प्रतिपादन आमदार शिंदे यांनी यावेळेस केले.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा