Breaking

सोमवार, २४ जून, २०२४

महाराष्ट्रात पुन्हा महायुतीचेच सरकार सत्तेत येणार - आ रामभाऊ सातपुते माळशिरस येथे आयोजित केलेल्या संकल्प मेळाव्यात बोलताना ठामपणे सांगीतले.



महाराष्ट्रात पुन्हा महायुतीचेच सरकार सत्तेत येणार - आ रामभाऊ सातपुते        माळशिरस येथे आयोजित केलेल्या संकल्प मेळाव्यात बोलताना  ठामपणे सांगीतले.               


          
पिलीव प्रतिनिधी प्रमोद भैस-



  महाराष्ट्रात  पुन्हा महायुतीचेच सरकार सत्तेत येणार आहे. मी तुम्हाला खात्रीने सांगतो असा ठाम‌ विशवास  आमदार रामभाऊ सातपुते यांनी व्यक्त केला .ते माळशिरस येथे आयोजित करण्यात आलेल्या महायुतीच्या मेळाव्यात बोलत होते. यावेळी  राष्ट्रीय समाज पक्ष, रयत क्रांती संघटना, आरपी आय आठवले गट,महाराष्ट्र नवनिर्माण सेना, मल्हार  क्रांती संघटना, शिवसेना, सर्वपक्षीय तालुका विकास आघाडी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, भारतीय जनता पार्टी  या महायुतीचा संकल्प मेळावा माळशिरस येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी व्यासपीठावर  के के पाटील, शरद मोरे,राजकुमार हिवरकर, रणजित सुळ,सचिन वावरे,सुरेश टेळे,शिवाजी देशमुख, आबा धाईंजे,मिलींद सरतापे,बाळासाहेब सरगर,एन के साळवे,कैलास वामन,वैभव जानकर, अजिनाथ वळकुंदे, महादेव कोळेकर, सोमनाथ वाघमोडे, किशोर सुळ,दादासो ढवळे,राहुल ढेरे,बाळासाहेब वावरे,संजय देशमुख, यासह तालुक्यातील महायुतीचे पदाधिकारी यावेळी मोठ्या संख्येने  उपस्थित होते.यावेळी बोलताना आ रामभाऊ सातपुते यांनी  मला पक्षाने सोलापूरला उमेदवारी दिली  यावेळी  विरोधकांनी संविधान बदलणार, शेतकऱ्यांनच्या खतावर जि एसटी लावला,भाजपनेच महागाई वाढविली  तसेच राज्यात सुरु असलेल्या आंदोलनाचा निवडणुकीत परिणाम झाला यामुळेच पराभव झाला. परंतु आपल्याला तो पराभव विसरुन जोमाने काम करायचे आहे. शांततेच क्रांती करायची आहे. केंद्रात आता आपले सरकार  सत्तेत आहे यामुळे  निधीची कमतरता अजिबात भासणार‌ नाही. गेल्या साडेचार वर्षात आपण माळशिरस तालुक्यात जी विकासाची गंगा आणली यामुळे  तालुक्यातील जनतेचे आपल्यावर विशेष  प्रेम आहे. तालुक्याचा सालगडी म्हणून मी गेल्या साडेचार वर्ष प्रामाणीकपणे काम केले आहे. सर्वसामान्यांना न्याय देत सर्वांना  बरोबर घेऊन काम केल्याचे समाधान असुन यापुढेही सर्वांना बरोबर घेऊन  तालुक्यात काम‌ करणार आहे.  माझे व माळशिरस  करांचे अनोखे नाते निर्माण झाले असुन शेवटच्या  श्वासापर्यंत माळशिरस तालुक्यातील जनतेची सेवा करणार.  तर यावेळी  जिल्हा नियोजन समीती सदस्य के के पाटील  यांनी भाजपने मोहीते पाटील यांना  अडचणीतुन बाहेर काढले मात्र रणजितसिंह मोहीते पाटील यांनी लोकसभा निवडणुकीत पक्षाच्या विरोधात काम केले आहे. त्यामुळे  त्यांच्या कडे थोडीशी जर नैतीकता असेल तर ताबडतोब  आमदारकीचा राजीनामा  दयावा असा ठराव मांडला त्या ठरावास उपस्थितथांनी पाठींबा देत घोषणाबाजी केली. मोहीते पाटील कुटुंबाने सुमित्रा  बँकेत  ठेवलेल्या ठेवी दिल्या नाहीत यामुळे अनेकांची कुटुंबे अक्षरशः  उद्धस्त झाली आहेत.जिल्हा बँकेत मोठे घोटाळे केले आहेत या बँकेतुन अगदी अस्तित्वात नसलेल्या संस्थाना मोठ्या प्रमाणात कर्ज दिली आहेत.सर्व सामान्यांची यांनी मोठ्या  प्रमाणात  पिळवणूक केली आहे. याची रितसर चौकशी होऊन यांच्यावर कारवाई  व्हावी अशी मागणी यावेळी  त्यांनी केली.या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन  भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस  दादासाहेब खरात यांनी तर आभार  प्रदर्शन बाळासाहेब सरगर यांनी केले.         
 
               फोटो  -  माळशिरस येथे आयोजित महायुतीच्या संकल्प मेळाव्यात बोलताना आ रामभाऊ सातपुते समोर  उपस्थित जनसमुदाय.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा