ग्रामीण भागातील महिलांनी स्वतःचा उद्योग सुरू करावा.. शिवाजीराव पवार
टेंभुर्णी प्रतिनिधी दिनांक
ग्रामीण भागामध्ये महिलांनी स्वतःच्या कौशल्याचा वेगवेगळ्या पद्धतीने उपयोग करून व्यवसाय चालू करावा आणि शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन अन्य महिलांच्या हाताला काम देण्याची तयारी ठेवली तरच ग्रामीण महिला उत्तम पद्धतीने उद्योगात यशस्वी होऊ शकतात असे प्रतिपादन यशदाचे राज्य प्रशिक्षक शिवाजीराव पवार यांनी टाकळी टेंभुर्णी येथे बोलताना केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन गावचे सरपंच तानाजी सलगर, बचत गटाच्या प्रमुख उज्वला शिरसाठ, माजी सरपंच माधुरी माने, सुभाष घाडगे,यशदाचे शिवाजीराव पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
पवार बोलताना पुढे म्हणाले की ग्रामीण भागामध्ये खूप चांगल्या पद्धतीने प्रक्रिया उद्योगांना वाव आहे परंतु शासनाच्या योजनांचा अभाव असल्यामुळे लोकांपर्यंत या योजना पोहोचत नाहीत तसेच बँकांनी सहकार्य केल्यानंतर खूप मोठ्या प्रमाणात लघुउद्योग सुरू होऊ शकतात प्रशिक्षणामधून मिळालेल्या ज्ञानामधून महिलांचा आत्मविश्वास वाढला आणि उद्योग सुरू करण्याची महिलांची मानसिकता तयार झाली. महिलांना कोणत्याही प्रकारचं सहकार्य करण्याची भूमिका सरपंच तानाजी सलगर यांनी व्यक्त केली. या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी गावातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यावेळी वेगवेगळे उद्योग शासनाच्या सबसिडीच्या आणि कर्जाच्या योजना वेगवेगळ्या परवान्याची माहिती यामध्ये देण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उज्वला शिरसाट यांनी केले तर आभार प्रदर्शन सौ कांबळे यांनी केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा