Breaking

शुक्रवार, २० डिसेंबर, २०२४

आदर्श सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी सरपंच परिषद करमाळा यांच्या वतीने ग्रामपंचायत बंद ठेवून निषेध आंदोलन.


आदर्श सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी सरपंच परिषद करमाळा यांच्या वतीने ग्रामपंचायत बंद ठेवून निषेध आंदोलन.


करमाळा प्रतिनिधी:
 बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे आदर्श सरपंच संतोष देशमुख यांची समाजकंटकांनी निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेचा निषेध म्हणून सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्राच्या वतीने सोलापूर जिल्ह्यात आज  ग्रामपंचायत बंद ठेवून आंदोलन करण्यात आले. जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील श्रीदेवीचामाळ ग्रामपंचायत येथे सरपंच परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष ॲड विकास जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत तालुकाध्यक्ष डॉ.अमोल दुरंदे, डॉ.अमोल घाडगे, सरपंच योगेश सोरटे, सरपंच राजेंद्र भोसले, गणेश जाधव यांच्यासह उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी ग्रामपंचायत बंद करून या आंदोलनाची सुरुवात केली. राज्यात वारंवार हत्येचे सत्र सुरू असून, अलीकडच्या काळात राजकीय लोकांची देखील मोठ्या प्रमाणात हत्या होताना दिसत आहेत. सातत्याने होणाऱ्या घटनेमुळे राज्यात सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे याचा निषेध म्हणून सरपंच परिषदेच्या वतीने आजचे आंदोलन करण्यात आले. स्व. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना तातडीने अटक करून मोक्का कायदा अंतर्गत कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा