माळशिरस तालुक्यातील जिल्हा परिषद शाळामध्ये सिसिटीव्ही कॅमेरे बसविण्यास विलंब का ? पालक वर्गातुन सवाल ,विद्यार्थ्यांचा सुरक्षीततेचा प्रश्न ऐरणीवर

पिलीव प्रतिनिधी प्रमोद भैस
माळशिरस तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेमध्ये सिसिटीव्ही कॅमेरे बसविणयास विलंब का होत आहे असा प्रश्न पालकामधुन विचारला जात आहे. तर शासनाने आदेश देऊनही अदयापही विदयार्थनचा सुरक्षीततेचा प्रश्न ऐरणीवरच आहे. महाराष्ट्र शासनाने २९ ऑगस्ट रोजी शासन निर्णयादवारे सर्व शाळांना सिसिटीव्ही कॅमेरे बसविणयाचा आदेश दिला आहे मात्र प्रशासनाने या आदेशाचे अद्यापही पालन केलेच नाही. शासनाच्या आदेशाला जिल्हा परिषद, व पंचायत समिती प्रशासनाने केराची टोपली दाखविला आहे. माळशिरस तालुक्यात अनुदानीत, विनाअनुदानित, माध्यमीक ,जिल्हा परिषदेच्या तसेच इंग्लिश मेडीअमच्या अनेक शाळा आहेत.ठाणे जिल्हयातील बदलापुर येथील दोन नामांकीत शाळेत मुलीवर अत्याचाराच्या घटना घडल्यानंतर शासनाने सर्व शाळेत मुलींच्या सुरक्षीततेच्या दृष्टीने सिसिटीव्ही कॅमेरे बसविणयाचा आदेश दिला होता .मात्र प्रशासनाच्या आदेशाला जिल्हा परिषद व पंचायत समिती प्रशासनाने केराची टोपली दाखविली आहे याचे कारण मात्र अदयापही समजले नाही. मग शाळेत अत्याचाराच्या घटना पुन्हा घडल्यावर प्रशासन जागे होणार का असा प्रश्न पालकामधुन विचारला जात आहे.
चौकट-
याविषयची निश्चित माहीती माळशिरस पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी प्रदीपकुमार करडे यांच्या कडुन घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा