स्नेहा इंगळे यांचा जन्मदिवस बाभुळगांवच्या माळावर ३०० झाडे लावुन केला साजरा.
माजी मंञी हर्षवर्धन पाटील यांच्या शुभ हस्ते केले वृक्षारोपन
[Aj24taas news ]
इंदापूर प्रतिनिधी /शिवाजी पवार
इंदापूर मधील बाभुळगांवच्या माळावर अनोखा वाढदीवस साजरा करण्यात आला आहे. बाभुळगांव मधील स्नेहा अमोल इंगळे हीच्या ९ व्या वाढदिवसानिमित्त इंगळे परिवाराने तिनशे वृक्ष लागवडीचा संकल्प करत समाजापुढे एक अनोखा आदर्श घालून दिला आहे.माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या शुभहस्ते याचा शुभारंभ करण्यात आला.
बाभुळगांव मधील अमोल इंगळे यांच्या कन्येचा नववा वाढदिवस आज दि.२७ रोजी साजरा करण्यात आला. यावेळी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांची खास उपस्थिती होती. पाटील यांच्या उपस्थितीत माळावरचं केक कापून स्नेहा ला उदंड आयुष्याच्या शुभेच्छा देण्यात आल्या. तर याच माळावर पर्यावरण संरक्षण काळाची गरज ओळखून इंगळे परिवाराकडून तिनशे वृक्षांची लागवड देखील करण्यात आली.
यावेळी हर्षवर्धन पाटील म्हणाले, नवीन पिढी जोमाने व नव्या तडफेने पुढे येत आहे. याचा आम्हाला आनंद आहे.अमोल चा सामाजिक उपक्रमात नेहमीच सहभाग असतो. वेळोवेळी सामाजिक उपक्रम राबवून समाज उपयोगी कार्य करण्यावर त्याचा नेहमीच भर असतो. त्याने अल्प काळात चांगले युवकांचे संघटन देखील निर्माण केले अाहे. आजच्या उपक्रमाबद्दल ही त्याचा मला अभिमान वाटतो. सध्या कोरोना वायरस चे थैमान असून याकडे गांभीर्याने पाहीले पाहीजे. मात्र काहींना याचे गांभीर्य राहीले नसल्याचे दिसून येते. असे म्हणत पाटील यांनी नांव न घेता राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या सुरपट्या च्या डावावर आक्षेप नोंदवला.
पाटील पुढे म्हणाले कोरोना हा पर्यावरणाशी संबंधित आहे.त्यामुळे भविष्याचा विचार करुन झाडे लावणे ही महत्वाचे आहे. केवळ फोटो सेशन नको तर ही झाडे जगली पाहिजेत अशी स्पष्ट सुचनाच पाटील यांनी यावेळी दिली. खरे तर वनविभागाने यावर अधिकचा भर देणे गरजेचे असताना जनतेचे प्रपंच उध्वस्त करण्यात त्यांना अधिकचा रस आहे. सध्या अशा कारवाया जास्त होताना दिसताता. अतिक्रमण काढण्यात शक्ती वाया घालण्यापेक्षा वृक्षारोपनावर भर दिला तर पर्यावरण राखले जाईल. जनतेचे प्रपंच उध्दस्त करण्यापेक्षा पर्यायी मार्ग काढुण सर्व सामान्य जनतेला दिलासा द्यावा असे मत पाटील यांनी वनखात्याचे कान टोचले. केवळ वृक्षारोपन न करता त्याची जबाबदारी स्विकारुन त्याचे संवर्धन देखील करु असा शब्द इंगळे परिवारच्या वतीने यावेळी देण्यात आला.
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्या रुतुजा पाटील,जेष्ट नेते कल्याण गुरगुडे, संचालक भास्कर गुरुगुडे,सरपंच भारत यादव,सरपंच रविंद्र पाटील, तालुकाध्यक्ष राम आसबे, प्रितम देवकर, पै.बबलू पठाण,विजय देवकर, सोमनाथ जावळे, पोपट भोसले, नागनाथ गुरगुडे, डाॅ.दत्तात्रय भोसले,शिवाजी जगताप, अतुल सरडे, रामभाऊ जमदाडे, वनरक्षक एस.व्ही.गिते आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी शिवाजी जगताप, भगवान मोरे सर आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. सुत्रसंचालन महेश इंगळे यांनी केले तर आभार राजेंद्र इंगळे यांनी मानले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा