*केंद्र सरकारने आण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार देण्यासाठी राज्य शासनाने प्रयत्न करावा ..। आ.बबनदादा शिंदे यांचे मुख्यमंत्र्यांना साकडे*
आमदार बबनदादा शिंदे
aj24taas news
बेंबळे।प्रतिनिधी / रामदाशी मुकुंद
*केंद्र सरकारने आण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार देण्यासाठी राज्य शासनाने प्रयत्न करावा ..। आ.बबनदादा शिंदे यांचे मुख्यमंत्र्यांना साकडे*
साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांना केंद्रसरकारने मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करावे व यासाठी राज्य शासनाच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्राकडे शिफारस करावी अशी मागणी आमदार बबनराव शिंदे यांनी केलेली आहे.
महाराष्ट्राच्या साहित्य क्षेत्रात अनमोल योगदान असणाऱ्या साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे २०२० हे जन्मशताब्दी वर्ष आहे. साहित्य , राजकारण व समाजकारणात अण्णाभाऊंचे मोठे योगदान आहे.आण्णाभाऊ साठे याचा जन्म वाळवा तालुक्यातील वाटेगांव येथे 1 ऑगस्ट १९२० रोजी झाला होता. ते फक्त इयत्ता दुसरी पर्यंत शिकलेले होते. तुकाराम भाऊराव ऊर्फ अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या प्रगल्भ विचारसरणीच्या जोरावर मराठी भाषेत ३५ कादंबऱ्या, १५ लघुकथा संग्रह, १२ पटकथा, रशियातील भ्रमंती हे प्रवासवर्णन तर शाहिरी पोवाडा शैलीतील गाण्यांचे १२ संग्रह तयार केले होते. त्यांनी आपल्या साहित्यातून वंचित, दलित व मागासवर्गीय समाजाच्या व्यथा आणि वेदना अतिशय प्रभावी आणि परिणामकारक रित्या मांडून समाजावरील अन्यायाचे निवारण करण्यासाठी आटोकाट प्रयत्न केलेला आहे. त्यांची' फकीरा 'ही कादंबरी अतिशय गाजलेली होती, तिचे इतर भाषेतूनही रूपांतर झाले होते, तसेच 'फकीरा ' हा गाजलेला चित्रपटही तयार झाला होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कडून प्रेरणा घेऊन अण्णाभाऊ साठे यांनी राजकारण व समाज कार्यात देखील नेत्रदीपक कार्य केले केले होते.
अशा या साहित्यरत्न, समाज सुधारक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना ,केंद्र शासनाकडून मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार प्रदानकरुन सन्मानित करण्यात यावे व या साठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी केंद्र सरकारकडे शिफारस करावी असे साकडे आमदार बबनराव शिंदे यांनी मुख्यमत्र्यांना घातले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा