.
*जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष भोसे (ता.पंढरपूर) येथील राजूबापू पाटील यांचे कोरोना? ई. अल्पशा अजाराने निधन*.
-----------------------------------
*◼️पंचायत समितीचे माजी सभापती,विठ्ठल कारखान्याचे संचालक होते*
-----------------------------------
*◼️घरातील तिसरा बळी;एक भाऊ चार ते पाच दिवसांपूर्वी तर चुलात्यांचे 10 दिवसांपूर्वी निधन*
-----------------------------------
*aj24taas news mharastr*
***************************
टेंभुर्णी [प्रतिनिधी ] सोलापूर जिल्ह्यात कोरोनाने थैमान घातले आसुन सोलापुर जिल्ह्यात सहीत ग्रामिन भागात राज्य सरकारला व प्रशासनाला कोरोणा रोखण्यास अपयश आले असुन या जिल्हाला कोरोनाने आजुन किती बळी जानार हा सर्वसामान्या जनते पुढे प्रश्न पढला आहे या जिल्ह्याला वारीस कोण नसल्याचे आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांला मुकावे लागले असे म्हणायला वावगे ठरणार नाहीना ?
सोलापुर जिल्ह्यात राजकीय वसा असणारे कै यशवंत भाऊ पाटील यांचे पुत्र राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष राजू बापू पाटील यांचे आज पहाटे दुःखद निधन झाले .
ते गेल्या काही दिवसापासून ते कोरोना संसर्गित होते , त्यांच्या कुटुंबात अवघ्या एक महिन्याभरात तीन सदस्यांचा मृत्यू झाला आहे. राजू बापू यांचीही अखेर कोरोणा संसर्गाच्या प्रादुर्भाव व ईतर आजार वाढल्यामुळेच त्यांचा मुत्यू झाल्याचे समजते.
राजु बापू पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे सर्वात जवळचे आणि विश्वासू सहकारी म्हणुन समजले जात होते.
विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संचालक आणि जिल्हा परिषदेचे सभापती पदाच्या माध्यमातून त्यांनी आपले पंढरपूर नव्हे तर सोलापुर जिल्ह्यात वलय निर्माण केले होते . यापूर्वी त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली होती.
शेतकऱ्यांनच्या हितासाठी त्यांनी गुळ कारखाना काढून ऊस उत्पादकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला होता. शरद पवार यांच्या शिफारशीवरून, रयत शिक्षण संस्थेच्या सदस्यपदी त्यांची नियुक्ती झाली होती, यापूर्वी त्यांचे वडील कै. यशवंत भाऊ पाटील यांनीदेखील तब्बल 49 वर्षापर्यंत या रयत शिक्षण संस्थेचे सदस्य पद भूषवले होते. एकाच कुटुंबातील दोन पिढ्यांना या संस्थेवर संधी देण्याचा इतिहास लिहिला गेला होता.
राजू बापू पाटील हे जिल्हा परिषद चे सदस्य होते, त्यांनी पाच वर्षे जि.प. चे काम पाहत असताना सभापती म्हणून देखील आपले कार्याचा ठसा उमटविला होता.
विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे ते संचालक होते. भोसे जिल्हा परिषदेवर त्यांचा एकहाती सत्ता होती
सर्वसामान्याला सहज भेटणारे आणि या पंचक्रोशीतील जनतेच्या अडीअडचणी सोडविणारे नेते माढा -पंढरपुर तालुक्यात ते लोकप्रिय होते. एकाच कुटुंबातील तिघेजन जाण्याने संपूर्ण सोलापुर जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा