.
टेंभुर्णी पो.स्टे. निवेदन देताना .....
*टेंभुर्णी जनता कर्फ्यू लागू करणे हा कोरोना वरती उपाय नाही - जि.अध्यक्ष राजकुमार [ बाबा ] धोत्रे*
------------------------------------------
जि.अध्यक्ष राजकुमार धोत्रे
A J 24Taas news Maharashtra Network
***************************
...... टेंभुर्णी [प्रतिनिधी ] सोलापूर जिल्ह्या बरोबर ग्रामीण भागातील करोनाची वाढती संख्या पाहून टेंभुर्णी शहरामध्ये टेंभुर्णी ग्रामपंचायतने दिनांक 27 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट अखेरपर्यंत जनता कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय घेतला आहे
.. तो टेंभुर्णी शहर हे बंद करणे हा कोरोना वरती ठोस उपाय नसून टेंभुर्णी जनतेमध्ये टेंभुर्णी ग्रामपंचायत ने व प्रशासनाने समाजजागृती करून टेंभुर्णी चालू ठेवणे गरजेचे आहे.
टेंभुर्णी शहरामध्ये अनेक छोटे-मोठे व्यवसाय असून आसपासच्या पंचक्रोशीतून शेतकरी नागरिक बाजार खते बी - बियाणे खरेदीसाठी टेंभुर्णी शहरात येत असतात. कोरोणाच्या च्या महामारी मुळे गेल्या अनेक महिने कोराना मुळे जगणे अशक्य झाले आहे. त्यामुळे टेंभुर्णी बंद न ठेवता प्रत्येक वार्डामध्ये जनजागृती करून सामाजिक अंतर ठेवत टेंभुर्णी सुरू ठेवणे गरजेचे आहे. तरच लोकांना जगणे सोपे होईल. अथवा कोरोणाच्या महा-मारी पेक्षाही भूकमारी लोकांचे सर्वसामान्यांचे जीवन उद्ध्वस्त होईल असे वडार पॕन्थर चे जिल्हा अध्यक्ष राजकुमार बाबा धोत्रे यांनी सांगितले .
.. टेंभुर्णी अनेक दिवसापासून लोक लाॕकडाऊन व ऊठ सुट बंद मुळे लोक कोरोणाच्या दहशतीमध्ये जगत आहेत .त्यामुळे जनतेसमोर आनेक समष्यांचे डोंगर निर्माण झाले आहेत. त्यामुळे ग्रामपंचायतीने स्वच्छता, बंदोबस्त व सामाजिक जागृती, कडे लक्ष द्यावे .
जनता कर्फ्यू लागू करू नये असे आज दुपारी टेंभुर्णी पोलिसस्टेशनचे पो.नि. राजकुमार केंद्रे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
या वेळी टेंभुर्णी येथिल महावीर वजाळे, अनिल आरडे, रोहिदास पवार, नितीन चव्हाण, रोहित धोत्रे ,सुरज धोत्रे, रणजित पवार ,महादेव धोत्रे ,अधिक जण उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा