Breaking

शुक्रवार, १४ ऑगस्ट, २०२०

राजवर्धन पाटील यांनी समय तत्परता दाखवलेमुळे वाचले दोघांचे प्राण


राजवर्धन पाटील यांनी समय तत्परता दाखवलेमुळे वाचले दोघांचे प्राण 



इंदापूर प्रतिनिधी शिवाजी पवार
------------------------------------------ 
news aj24taas 

निरा भिमा सहकारी साखर
 कारखान्याचे संचालक व युवानेते राजवर्धन पाटील आपल्या नियोजित लग्न भेटीसाठी शुक्रवार दिनांक १४/८/२०२० रोजी इंदापूर वरुन भिगवणला हायवेवरुन येत असताना पळसदेव व काळेवाडी   यांच्यामध्ये टुविलर गाडी वरती जात असलेल्या दोन लोकांना एक चार चाकी गाडी उडवून गेली होती. व तेथे दोघेजण जखमी अवस्थेत पडलेले पाहुन राजवर्धन
पाटील यांनी तत्परतेने गाडी उभी करुन अॅब्युलस ला फोन लावला पण ॲब्युलस येण्यास उशीर होईल हे समजताच राजवर्धन पाटील यांनी वेळ न लावता दोन्ही अपघातग्रस्ताना आपल्या स्वताच्या गाडीत भिगवण येथील थोरात हाॅस्पिटल येथे पुढील उपचारासाठी घेऊन गेले येथे पाटील यांनी दाखवलेल्या संवेदनशीलते मुळे सदर व्यक्तीचे पुढील उपचार त्वरित झाल्याने त्याचे प्राण वाचले.

राजवर्धन पाटील यांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे या दोघांना ताबडतोब उपचार मिळाल्यामुळे प्राण वाचु शकले.

या वेळी उपस्थित डॉक्टरांनी सांगितले की सदर व्यक्तीस पायाला व डोक्यावर गंभीर जखम झाली असून त्याचे रक्त गेले असल्याने अशक्तपणा आला आहे,अंबुलन्स ची वाट बघत आणण्यास उशीर झाला असता तर दुर्दैवी घटना घडू शकली असती यामुळे त्यांनी राजवर्धन पाटील यांचे आभार मानले..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा