*वंचित बहुजन आघाडी चा सलग 166 दिवस उपक्रम मा कमलेश कदम यांच्या हस्ते 13 गरजूंना धान्य किट चे वाटप करण्यात आले**
aj 24Taas News Maharashtra
प्रतिनिधी रूपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद
उस्मानाबाद दि 23 सप्टेंबर (प्रतिनिधी) वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तालुका नेते मा कमलेश कदम च्या हस्ते.13 गरजू कुटुंबांना किराणा मालचे वाटप दि 23 सप्टेंबर रोजी करण्यात आले.
वंचित बहुजन आघाडी च्यावतीने गरजू कुटूंबांना जीवनावश्यक साहित्याचे वाटप करण्यात येत असून आजचा166 वा दिवस आहे. तर आजपर्यंत 2935 कुटूंबांना अन्नधान्य वाटप केले आहे.
वंचित बहुजन आघाडी , भारतीय बौद्ध महासभा, प्रबुद्ध कुष्ठरोग निर्मूलन व पुनर्वसन संस्था, कामठा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सेवाभावी संस्था, उदगीर ,शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व हितचिंतक दानशूर यांच्या सहकार्याने व मिलिंद रोकडे जीवन कदम सुरेश चौधरी विकास बनसोडे मार्गदर्शनाखाली हे वितरणप करण्यात येत आहे.या वाटपाच्या वेळी वंचित बहुजन आघाडीचे मिलिंद (दादा) रोकडे जीवन कदम उपस्थित होते. सूत्रसंचालन शुकेशन ढेपे यांनी तर उपस्थितांचे आभार कृष्णा लोंढे यांनी मानले.
प्रतिनिधी रूपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा