*राज्य सरकार, केंद्र सरकार व विरोधी पक्षानी फसवले मराठा समाजाला. निवास शेळके*
*इंदापूर प्रतिनिधी/: शिवाजी पवार* *AJ 24 Tass News Maharashtra*
मराठा एस.बी.सी.आरक्षण स्थगितीस राज्य सरकार व विरोधी पक्ष ह्या दोघांनी मिळून मराठा समाजाला स्पष्ट पणे फसवले आहे. त्यामुळे सरकार आणि विरोधी पक्ष या दोघांचा व पक्षपाती पणा करायला भाग पाडणार्या केंद्र सरकारचा अा. भा. संभाजी ब्रिगेडचे पुणे विभागीय अध्यक्ष मा. निवासजी शेळके यांनी अखिल भारतीय संभाजी ब्रिगेड व संपूर्ण सकल मराठा समाजाच्या वतीने प्रथमथा तीव्र शब्दात जाहीर निषेध केला.
सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिली आहे. सरकारच्या व विरोधी पक्षाच्या नाकर्तेपणामुळच व वेळोवेळी पाठपुरावा न केल्याने मराठा समाजावर ही वेळ आली आहे.
कितेक वर्षा पासुन अनेक राज्यांची आरक्षणा विषयी सुनावण्या प्रलंबित आहेत. तरी मराठा आरक्षणाची सुनावणी का? अाणि मराठा आरक्षणातील वकील का बद्दलण्यात आले? सरकारने व विरोधी पक्षाने मराठा समज्याचा विश्वास घात करुण मराठा सामज्याला फसवले आहे. तरी मराठा आरक्षणावरील बंदी उठवण्या साठी सरकारने तात्काळ पावले उचलावीत आन्याथा आखिल भारतीय संभाजी ब्रिगेड व मराठा समाजाच्या वतीने पुन्हा तिव्र आंदोलन करण्यात येईल.
जर सरकार व विरोधी पक्ष वेळ काढूपणाचे धोरण राबवत आसतील तर मराठा समाज रसत्यावर उतरुन जबाबदार असणार्या लोकप्रतिनिधी राज्यातील मंञी, आमदार व खासदार यानां जिल्हा व तालुका बंदी करावी लागेल. व राज्यभर आखिल भारतीय संभाजी ब्रिगेड व सर्व मराठा सकल समाज्याचे वतीने तीव्र आंदोलन करणार आसल्याची माहीती श्री. निवासजी शेळके यांनी दिली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा