जातिनिहाय जनगणना न घेतल्यास असहकाराची भुमिका घ्यावी...संभाजी ब्रिगेड
नांदेड प्रतिनिधी/बालाजी सिरसाट
AJ24 Taas News Maharashtra
दि.05,
ओबीसी सह सर्व समाजाची जातिनिहाय जनगणना ही संभाजी ब्रिगेडची मागणी होती,यासंदर्भात महाराष्ट्र सरकारने जातनिहाय जनगणना करण्याबाबत ठराव केंद्रसरकारकडे पाठविला आहे. परंतु केंद्र सरकार सर्व समाजाची
जातनिहाय जनगणना करणार नसल्यास महाराष्ट्र राज्य जनगणना प्रक्रियेबाबत असहकाराची भुमिका घेईल असा आशयाचा ठराव येणाऱ्या पावसाळी अधिवेशनात घ्यावा असे निवेदन नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर,लोहा कंधार चे आमदार शामसुंदर शिंदे यांच्या पत्नी,आशाताई शिंदे हदगाव हिमायतनगर चे आमदार माधवराव जवळगावकर नांदेड दक्षिणचे आमदार मोहन अण्णा हांबर्डे यांचे प्रतिनिधी यांना देण्यात आले...
संदर्भ:- सोबत जोडलेले दिनांक 2 सप्टेंबर 2020 रोजी मुख्यमंत्री महोदयांना पाठवलेले निवेदन आपणास सोबत जोडत आहे.
आपण आमच्या मतदार संघातील ओबीसी समाजाचे प्रतिनिधी म्हणुन महाराष्ट्राच्या विधिमंडळात कार्य करीत आहेत.सध्या ओबीसी समाज विविध समस्यांनी ग्रस्त आहे.यातून ओबीसी समाजाला बाहेर काढण्यासाठी संभाजी ब्रिगेडने राज्य सरकारकडे दिनांक 2 सप्टेंबर 2020 रोजी सोबत जोडलेला प्रस्ताव व मागण्या पाठविला आहे.
पावसाळी अधिवेशनात सदर प्रकरणी चर्चा घडवून आणली जावी व ओबीसी समाजाचे प्रश्न मार्गी लावावे म्हणून आपण आग्रही भूमिका घ्यावी. अधिवेशनाचा कालावधी कमी असल्याचे कारण पुढे न करता कालावधी वाढविण्यासाठी प्रयत्न करावा.अशी ओबीसी समाजाच्या वतीने आम्ही आपणास विनंती करीत आहोत.
ओबीसी समाजाच्या प्रश्नावर आपण भूमिका न घेतल्यास ओबीसी भावंडासोबत संभाजी ब्रिगेडला आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागेल.
यावेळी संभाजी ब्रिगेडचे नांदेड जिल्हाध्यक्ष सुभाष कोल्हे हरसदकर,लोकसभा अध्यक्ष संकेत पाटील,जिल्हा कार्याध्यक्ष परमेश्र्वर पाटील, जिल्हा उपाध्यक्ष कमलेश कदम,कंधार तालुकाध्यक्ष नितीन कोकाटे,नांदेड दक्षिण तालुकाध्यक्ष दत्ता येवले,गिरधारी जोगदंड,ज्ञानेश्वर शिंदे, बालाजी देशमुख ,किरण वानखेडे, गोविंद कौशल्य,उपस्थित होते...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा