*********
*पोलिस प्रशासनाने पदयात्रेला परवानगी नाकारली..... जहागीरदार*
*********************************
टेंभुर्णी प्रतिनिधी:AJ 24 Taas News Maharashtra
टेंभुर्णी येथील उपजिल्हा रुग्णालयाचे मागणीबाबत आरोग्य विभाग (महाराष्ट्र शासन) मुंबई यांनी 2018 साली बजेटसहित 50 खाटांचे टेंभुर्णी उपजिल्हा रुग्णालयाचा मंजुरीचा प्रस्ताव प्रधान सचिव आरोग्य विभाग मंत्रालय मुंबई यांचेकडे सादर केले होते,परंतू गेली तीन वर्षापासून सदरचे प्रस्ताव प्रलंबित असुन त्यावर कोणतीही मंजुरी मंत्रालयाने दिली नसल्याने,त्याची मंजुरी मिळावी या मागणीसाठी सामाजिक कार्येकर्ते बशीर जहागीरदार यांनी 2 ऑक्टोबर रोजी कार्येकर्तेसहीत टेंभुर्णी ते मंत्रालय पदयात्रा काढण्याचे निवेदन प्रशासनाला दिले होते.परंतू पोलिस प्रशासनाने सदर पदयात्रेला परवानगी नाकारली असल्याची माहीती बशीर जहागीरदार यांनी दिली आहे.
पोलिस प्रशासनाने दिलेले नोटीस मध्ये म्हटले आहे की सध्या कोरोनाचे प्रादुर्भाव ग्रामीण व शहरी भागात जास्त वाढलेले आहे,तसेच जिल्हाधिकारी यांचे जमावबंदीचे आदेश लागू आहे.पावसाळा सुरु आहे,तसेच लांब पल्ल्याची पदयात्रा असल्याने त्या दरम्यान पदयात्रेत सामील असणाऱ्या पैकी कुणासही कोरोनाची लागण झाल्यास त्याला संपुर्ण पणे जबाबदार सर्वस्वी तुम्ही असणार आहे.जिल्हाधिकारी यांचे जमावबंदीचे आदेश,आपत्ती व्यवस्थापन कायदा व कोरोनाचे वाढते प्रादुर्भाव व पोलिस प्रशासनावर पडत असलेले बंदोबस्ताचे तान व लांब पल्ल्याची पदयात्रा या सर्व पार्श्वभुमीचे अनुषंगाने पदयात्रा काढण्यास परवानगी नाकारण्यात येत आहे, याउपरोक्त आपण पदयात्रा काढल्यास तुम्हा वर व तुमच्या कार्यकरत्यांवर गुन्हा दखल करण्यात येईल.आपण इतर सनदशीर मार्गाने आंदोलन करावे असे पोलिसांनी दिलेले नोटीसीत म्हटले आहे.
टेंभुर्णी व जवळ पासचे 40 गावातील नागरिकांना आरोग्यसेवा योग्यरिते मिळत नसल्याने, उपजिल्हा रुग्णालयाची टेंभुर्णीत अत्यंत गरज असल्याने, टेंभुर्णी उपजिल्हा रुग्णालयाची मागणी सर्व प्रथम सामाजिक कार्येकर्ते बशीर जहागीरदार यांनी केली होती व ती मागणी लावुन धरली आहे.यासाठी त्यांनी गेली 3 वर्षात 5 आंदोलने यासाठी केलेले आहे.त्यांचे आंदोलनाला यश येऊन नागपुर अधिवेशन काळात आरोग्य संचालक,महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी बजेटसहित 50 खाटांचे उपजिल्हा रुग्णालयाचा 12 पानी मंजुरीचा प्रस्ताव 2018 साली मंत्रालयात सादर केले होते,परंतू मंजूरीचा प्रस्ताव मंत्रालयात धुळखात पडल्याने सदरची पदयात्रा काढण्याचे निवेदन बशीर जहागीरदार यांनी प्रशासनाकडे दिले होते व त्या अनुषंगाने टेंभुर्णी पोलीस प्रशासनाने सदरची नोटीस बशीर जहागीरदार यांना बजावली आहे.
पोलीस प्रशासनाने दिलेले नोटीसाचे मान ठेउन तसेच कायदेपेक्षा कुणीच मोठा नसल्याने सदरची पदयात्रा तातपूर्ती स्थगित करीत असुन, पुढील प्रमाणे योग्यवेळी योग्य निर्णय घेउन पुढील आंदोलनाची दिशा ठरवली जाईल.तसेच जो पर्यंत उपजिल्हा रुग्णाल्याचा काम सुरु होत नाही तो पर्यंत स्वस्थ बसणार नसल्याचे जहागीरदार यांनी म्हटले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा