इंदापूरसह पश्चिम पट्यात वादळी वार्यासह पाऊसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करावेत. रामभाऊ अासबे
इंदापूर प्रतिनिधी शिवाजी पवार
इंदापूर तालुक्यातील पश्चिम पट्यात जोरदार वादळी वार्यासह झालेल्या मुसळधार पाऊसामुळे खरीप हंगामातील पिके खाली झोपली अाहेत तसेच फळबागांचे ही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे.
रविवारी रात्री आठ वाजता वादळी वाऱ्यासह पाऊसाला सुरुवात झाली, जवळ जवळ एक ते अाडीच तास पाऊस झाला. वाऱ्याचा जोर जादा असल्याने व पाऊस मोठा असल्याने ऊस,कडवळ,मका, बाजरी तसेच फळबागा डाळींब, केळी, पपई, सिताफळ इत्यादीसह पिंकाचे मोठयाप्रमाणात नुकसान झाले अाहे त्याचे त्वरीत पंचणामे करावे असे अव्हान भारतीय जनता युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष रामभाऊ अासबे यांनी केले अाहे. त्वरीत पंचनामे करुन नुकसान भरपाई माझ्या शेतकरी बांधवाला मिळाली पाहिजे नाही तर भाजप युवा मोर्चातर्फे ज्या ९ ते १० गावातील शेतकर्यांच्या पिकांचे व फळबागाचे नुकसान भरपाई शासनाने नाही दिले तर तीव्र अंदोलन याविरोधात केले जाईल.
इंदापूर तालुक्यातील , बाभूळगाव, अवसरी, बेडशींग,भांडगाव, वडापुरी ,काटी ,रेडा, रेडणी ,शेटफळ हवेली परिसरात शेतातून पाणी वाहत आहे तर हाता तोंडाला आलेले पीकांसह बागाचे नुकसान झाल्याने शेतकरी माञ पूर्णपणे हवालदिल झाला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा