Breaking

मंगळवार, २० ऑक्टोबर, २०२०

शेतकऱ्यांना सरसकट 50 हजार रुपये भरपाई देण्याची स्वाभिमानीची मागणी**अतुल वारे पाटील-करमाळा*



*शेतकऱ्यांना सरसकट 50 हजार रुपये भरपाई देण्याची स्वाभिमानीची मागणी*


*अतुल वारे पाटील-करमाळा*
      करमाळा प्रतिनिधी दि.  शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी 50000 रूपये मदत जाहीर करावी अशी मागणी करमाळा तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली आहे.संघटनेच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. 
       निवेदनात म्हटले आहे की दोन दिवसांपूर्वी झालेल्या अती पावसाने शेतकऱ्यांच्या जमिनी पिका सहीत वाहून गेल्या आहेत .त्यामुळे शेतकरी पार मोडला आहे . शासनाने शेतकऱ्यांना कुठलेही निकष न लावता , सरसकट हेक्टरी 50000 रुपये मदत शेतकऱ्यांना लवकरात लवकर द्यावी, तरच शेतकरी वाचेल . या मागणीची पूर्तता त्वरित न झाल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटना  शेतकऱ्यांना सोबत घेऊन तिव्र आंदोलन करेल असा इशारा  या निवेदनाद्वारे दिला आहे .
या वेळी
मा.जिल्हा अध्यक्ष रवींद्र गोडगे,
ता.युवा अध्यक्ष सुदर्शन शेळके,
ता उपाध्यक्ष अमोल घुमरे,
दिपक शिंदे,आण्णां झोळ,बापू फरतडे आदी  उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा