*करमाळा तालुक्याला आमदार संजय मामा शिंदे यांच्या रूपाने हिरा सापडला -हनुमंत मांढरे-पाटील*
Aj 24 Taas News Maharashtra
*अतुल वारे पाटील- करमाळा*
********************************************
करमाळा तालुका अनेक वर्षांपासून नेतृत्वासाठी आसुसलेला होता. गेली कित्येक वर्षं जी उणीव भासत होती ती उणीव आमदार संजय मामा शिंदे यांनी भरून काढल्याने तालुक्यातील लोकांमध्ये समाधानाची भावना असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे करमाळा तालुकाध्यक्ष हनुमंत मांढरे यांनी केले.
**aj24 Taas News * प्रतिनिधीं शी
यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की, मध्ये चर्चा सुरू आहे आणि माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी संजय मामांच्या रूपात हिरा पारखला होता आणि तालुक्यातील जनतेला संजय मामा शिंदे यांना सहकार्य करण्याचेआवाहन केले होते.संजय मामांनी तो विश्वास सार्थ ठरवत विकास कामांचा सपाटा लावला आहे.करमाळा तालुक्याचा विकास करायचा आसेल आणि गेली वीस वर्षे विकासाच्या दृष्टीने पाठिमागे गेलेला तालुका जर पुढे घेऊन जायचा आसेल तर संजय मामा शिंदे यांच्या शिवाय पर्याय नाही असे ठाम मत त्यांनी व्यक्त केले. संजय मामा शिंदे यांची काम करण्याची पध्दत पाहुन महाराष्ट्र राज्य उप मुख्यमंत्री नामदार अजित दादा पवार यांनी देखील ओळखली आणि त्या वेळी मी तालुकाध्यक्ष आसताना संजय मामा शिंदे यांना पाठिंबा देण्याचे आदेश दिले. त्या प्रमाणे तालुक्यातील सर्व राष्ट्रवादी काँग्रेस च्या कार्यकर्त्यांनी व पदाधिकारी ने प्रामाणिकपणे वरिष्ठांचा आदेश पाळला व आमदार संजय मामा शिंदे यांचे काम केले आणि मामांना निवडून आणले .तसे पाहता करमाळा तालुक्यामध्ये एक म्हण प्रचलित होती *करमाळ आणि पाण्या साठी तरमळ*. परंतु काही दिवसात मा आमदार जयवंतराव जगताप यांनी पाण्याचा प्रश्न कायमचा मिटवला. मात्र थोड्याच दिवसात करमाळा तालुक्याची अवस्था *करमाळ आणि नेतृत्व साठी तरमळ* आसे म्हणायची वेळ आली परंतु आता मात्र ती उणीव आमदार संजय मामा शिंदे हे भरून काढताना दिसत आहेत .जवळपास वीस वर्षं विरोधकांना तल्लफ होणार नाही असे काम संजय मामा शिंदे यांचे चालू आहे. त्यामुळे करमाळा तालुक्याला हिरा सापडला म्हणायची वेळ आली असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे करमाळा तालुका कार्याध्यक्ष हनुमंत मांढरे-पाटील यांनी व्यक्त केले आहे.
करमाळा तालुका संजय मामांकडे विकासाच्या दृष्टिकोनातून आशेने पाहत असून संजय मामासुद्धा तालुक्याचे नंदनवन केल्याशिवाय राहणार नाहीत असा ठाम विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा