Breaking

शुक्रवार, ९ ऑक्टोबर, २०२०

*उदगीर येथे राज्य सरकारच्या विरोधात संभाजी ब्रिगेडच्या वतीने जन आक्रोश मोर्चा**AJ 24 Taas News Maharashtra



  *उदगीर येथे राज्य सरकारच्या  विरोधात  संभाजी ब्रिगेडच्या वतीने जन आक्रोश मोर्चा*


*AJ 24 Taas News Maharashtra
*उदगीर प्रतिनिधी/ जीवन भोसले* 
उदगीर /
सुप्रीम कोर्टांने मराठा समाजास दिलेल्या आरक्षणावर स्थगिती उठवण्यात यावी , शेतकऱ्यांना  सरसकट  हेक्टरी ५० हजार रुपये देण्यात यावे , हाथरस घटनेतील दोषिना फाशी देण्यात यावी  या संदर्भात उदगीर येथे संभाजी ब्रिगेडच्या वतिने नवनिर्वाचित  जिल्हाध्यक्ष  अतुल  काकडे यांच्या नेतृत्वाखाली डाँ. बाबासाहेब आंबेडकर  चौक ते उपजिल्हाधिकारी  कार्यालय  पर्य़त  केंद्र व राज्य सरकारच्या  विरोधात  जन आक्रोश मोर्चा  काढून  सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला .

या वेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हा प्रवक्ते सिध्देश्वर ला़डगे प्रस्ताविक   मांडताना  सांगितले की,शरद पवार साहेबांनी  राजकीय सत्ता स्थापन करण्यासाठी तीन वेगवेगळ्या  पक्षाना एकत्र करून राजकीय  समीकरन जूळून महा विकास अघाडी  सरकार स्थापन  करू शकत असतील  तर केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्याशी  समन्वय  साधून सर्व राजकीय पक्षाशी  समन्वय साधून   मराठा   समाजास  आरक्षन  मिळवून का  देऊ शकत नाही  तसेच मराठा  आरक्षणासाठी  एक होऊशकत नाहीत. अशी टिका केली तसेच केंद्र सरकारने मागनी केली  नसताना .गरज नसताना सवर्णांना  केंद्रात कायदा पारीत करून  आरक्षन  देऊ केले  तर मराठा समाजाला का देऊ शकत नाही हि भुमिका  जन अाक्रोश मध्ये मांडणात अाली त्या वेळी  संभाजी ब्रिगेड चे  कार्यकर्ते  गोपाळ भंडे ..शिवछत्रपती गणेश मंडळ  (कुमदाळकर ) . व जिल्हा प्रतिनिधी जीवन भोसले अदी उपस्थीत होते ........

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा