अतिवृष्टीच्या पाण्यामुळे मयत झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबाला प्रत्येकी चार लाख रुपये मिळावे ......
...नुकसानग्रस्तांचे पंचनामे व्हावेत..... तातडीने नुकसान भरपाई मीळावी.... आ.बबनराव शिंदे
बेंबळे। प्रतिनिधी।
*बेंबळी /प्रतिनिधी* AJ 24 Taas News Maharashtra
सलग तीन दिवस झालेल्या अतिवृष्टीमुळे माढा विधानसभा मतदारसंघातील अनेक ठिकाणचे प्रचंड नुकसान झाले आहे तसेच सीना व भीमा नदी काठावरील शेतकऱ्यांना जबरदस्त हानी पोहोचली आहे. या भागातील चार व्यक्ती अतिवृष्टी झालेल्या पाण्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी मयत झाले आहेत., अनेक गावात घरांची पडझड झाली आहे, शेळ्या मेंढ्या गाई म्हशी जनावरे काही ठिकाणी पाण्यात वाहून गेली आहेत, अशा सर्व नुकसान ग्रस्तांचे शासनाने तातडीने पंचनामे करून त्यांना नुकसान भरपाई ताबडतोब पोहोच करावी व मयतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी चार चार लाख रुपये द्यावेत अशी मागणी आमदार बबनदादा शिंदे यांनी पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.
अतिवृष्टीमुळे सीना नदीकाठच्या निमगाव, दारफळ, वाकाव ,उंदरगाव, केवड, सुलतानपूर, खैराव, कुंभेज ,तांदुळवाडी, वडशिंगे इत्यादी गावातील ऊस केळी द्राक्ष डाळिंब तसेच तूर सोयाबीन उडीद कांदा टोमॅटो मिरची व पालेभाज्या तसेच जनावरांची चारा वैरण पीके अतिवृष्टीमुळे उध्वस्त झाली आहेत. मुसळधार पावसामुळे ओढे-नाले तलाव तुडुंब भरून वाहत आहेत आणि ठीक ठिकाणचे रस्ते खचले आहेत, पूल वाहून गेले आहेत ,विद्युतपुरवठा बंद पडला आहे त्यामुळे काही गावांचा संपर्क देखील तुटला आहे .
निमगाव दहिवली रस्त्यावर चार चाकी स्विफ्ट कार ओढ्यात वाहून गेल्यामुळे शिवाजी भगवान यादव मांजरी तालुका हवेली जिल्हा पुणे,तसेच उद्धव बापू खरात टेंभुर्णी ,कलावती विठ्ठल कराळे कुर्डू व मनोहर नवल पाटील या व्यक्ती अतिवृष्टीमुळे अतिवृष्टीच्या पाण्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी मयत झाले आहेत. त्यांना प्रत्येकी चार लाख रुपये शासनाकडून मिळावे अशी मागणी आमदार शिंदे यांनी केली आहे.
भीमा नदीला आलेल्या पुरामुळे रांजणी, आलेगाव ,रुई, चांदज, शेवरे, मिटकलवाडी ,बेंबळे, वाफेगाव ,वाघोली ,कोंडरपट्टा ,नेवरे ,उंबरे, करोळे, नांदुरे ,पटवर्धन कुरोली ,पिराची कुरोली, देवडे कान्हापुरी , उंबरे पागे, उंबरे वे ,खेड भोसे, होळे, गुरसाळे ,भटुंबरे, शेगाव ,देगाव ,अजनसोंड, आदीसह अनेक गावात अतिवृष्टीचा व पुराच्या पाण्याने मोठा फटका बसला आहे .उभ्या पिकाची हानी झाली आहे घराघरात पाणी शिरल्यामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. अकोले बुद्रुक ,उजनी ,घोटी ,आहेरगाव, परिते यासह अनेक गावातील पाझर तलाव भरून वाहिले आहेत तर सांडवे फुटुन गेले आहेत .या सर्व गंभीर नुकसानग्रस्त परिस्थितीचा शासनाने तातडीने पंचनामा करून संबंधितांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी आमदार बबनदादा शिंदे यांनी केली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा