Breaking

गुरुवार, १५ ऑक्टोबर, २०२०

लोणंद मधील पूल पाण्याखाली;.जनजीवन विस्कळीतग्रामस्थांमधून पुलाची उंची वाढविण्याची मागणीसुशिल



लोणंद मधील पूल पाण्याखाली;.जनजीवन विस्कळीत
ग्रामस्थांमधून पुलाची उंची वाढविण्याची मागणी

सुशिल गायकवाड/लोणंद.

सर्वत्रच परतीचा पाऊस मुसळधार पणे बरसत असताना धरणे,नदी, नाले,ओढे,ओसंडून वाहु लागले आहेत.यामुळे पाण्याची साठवण मोठ्या प्रमाणात झालेल्या परिसरातून पूरजन्य परिस्थिती निर्माण झालेली पाहायला मिळालेली असते.ठिक ठिकाणी रस्त्यावरील कमी उंचीच्या असलेल्या पुलावरून पाणी वाहत गेल्याने पुराच्या पाण्याने जन जीवन अगदी विस्कळीत झालेले आहे 


खंडाळा तालुक्यातील लोणंद मध्ये ही अशीच परिस्थिती 
झालेली पाहायला मिळाली.लोणंदच्या पश्चिम भागात पावसाची जोरदार बॅटिंग झाली की खेमावती नदीला पूर येत असतो.खेमावती नदीला पूर आला की वाहतूक व्यवस्थेला ब्रेक लागत असतो.लोणंदमध्ये असलेल्या भिसे वस्ती जवळचा आणि माळी आळी येथील श्री म्हस्कोबानाथ मंदिरासमोरील हे दोन्ही छोटे फुल पाण्याखाली गेल्याने याचा परिणाम हा पूर्णपणे वाहतूक व्यवस्थेवर झालेला आहे.ही परिस्थिती दर वर्षी

सतत जोरदार पाऊस झाला की होतच असते.तसेच याचा प्रत्यय नागरिकांना येत असतो.अशा या पूर जन्य परिस्थितीमुळे लोणंद-शिरवळ रस्त्यावरील वाहतूक व्यवस्थेत दोन्ही बाजूला ये जा करताना खूप मोठी अडचण निर्माण होत असते.काल रात्री पासून ही पूर जन्य परिस्थिती उद्भवलेली असताना लोकांना ये जा करण्यात अडचण निर्माण झालेली असून अशा ही परिस्थिती सकाळ पासून काही जण या पाण्याच्या प्रवाहातून हिकडे तिकडे ये जा करताना नागरिक पाहायला मिळाले.लोणंद-शिरवळ च्या परिसरांतून कंपन्या असून या कंपन्यातुन तसेच इतर ठिकाणी
अनेक कामगार लोक हे कामास या मार्गातुन ये जा करीत असतात.परंतु अशा या परिस्थितीमुळे अनेकांना आपल्या कामाला दांड्या ही माराव्या लागल्या आहेत.
तसेच काहीजण अगदी जीव धोक्यात घालून ही ये जा करीत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.दरवर्षी ज्या प्रसंगास लोकांना सामोरे जावे लागत आहे.यावर कायमची समस्या सुटणारी उपाय योजना होणे गरजेचे आहे.प्रशासनाकडून यावर कायमचा तोडगा काढण्यासाठी पुढे यायला हवे.तसेच छोट्या पुलांची उंची वाढविण्यासाठी प्रशासनाकडून कृतीशील प्रयत्न केले पाहिजेत.अशी मागणी नागरिक करीत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा