*तुळजापूर तालुक्यातील सिंदफळ येथील शेतकरी सचिन पंडित बंडगर यांच्या द्राक्ष बागायतीचे पावसामुळे नुकसान*
तुळजापूर प्रतिनिधी /रूपेश डोलारे, उस्मानाबाद
जमिनी मधून काही क्षेत्र राष्ट्रीय महामार्ग बाह्यवळण रस्ता क्रमांक 361 साठी संपादित केलेला आहे. सदर राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरण शेतातून होत असताना पाण्याचा निचरा करण्याचे नैसर्गिक काम बंद केलेला आहे. त्याबाबत वेळोवेळी संबंधित गुत्तेदार नामी रंजीत यादव, विपुल सर, महावीर सर, अनील मिष्रा, पांडे साहेब, व राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 361 सक्षम अधिकाऱ्यांना देखील विनंती करून पाण्याचा निचरा करण्याचा नैसर्गिक मार्ग खुला करुन देणेबाबत अथवा त्याची योग्य विल्हेवाट लावण्याबाबत विनंती केली होती, परंतु संबंधित याबाबत कोणत्याही प्रकारची दखल घेतलेली नाही,दि,१४ ऑक्टोबर २०२० रोजी पडलेल्या मुसळधार पावसामुळे व राष्ट्रीय महामार्गाचे रस्त्याचे रुंदीकरण करते वेळेस पाण्याचा निचरा करण्याचे नैसर्गिक मार्ग बंद केल्यामुळे पाण्याचा योग्य निचरा न झाल्यामुळे पावसाचे पाणी शेतात हे जमिनीमध्ये साचलेले आहे, त्यामुळे जमिनीमध्ये असलेल्या द्राक्ष फळझाडाचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. तरि दिलीप कन्स्ट्रक्शन या नुकसानीस जबाबदार असुन नुकसान भरपाई मिळावी आशी मागणी शेतकरी करीत आहे.
.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा