उंबरे गावातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी धनराज शिंदे यांनी दिली भेट.
कन्हेरगांव दि. प्रतिनिधी (धनंजय मोरे. )
सोलापुर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे चंद्रभागा नदीला आलेल्या पुरामुळे नदीकाठच्या शेतकऱ्यांचे खुप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून माढा विधानसभा मतदारसंघाला जोडलेल्या माळशिरस तालुक्यातील उंबरे (वे) गावालाही या पुराचा मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे.आज माढा वेल्फेअर फाऊंडेशनचे अध्यक्ष तथा पंचायत समिती सदस्य धनराज दादा शिंदे यांनी नुकसानग्रस्त उंबरे वे गावाला भेट देऊन तेथील परिस्थितीची समक्ष जाऊन पाहणी केली. त्यांच्यासोबत नाळ फाऊंडेशन चे अध्यक्ष अॅड. सुजितकुमार थिटे होते.
यावेळी गावातील शेतकरी अभिमान थिटे ,अमोल थिटे , महादेव थिटे , रोहित थिटे यांच्या सह नुकसानग्रस्त शेतकरी यांच्या शेतात जाऊन प्राथमिक पाहणी केली व आमदार बबनदादा शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली शासनाकडे पाठपुरावा करुन येथील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरात लवकर शासकीय मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले. यावेळी महाराष्ट्र राज्य पदवीधर संघटनेचे अध्यक्ष सुजितकुमार थिटे ,महेश मारकड, सुजित भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा