*अतिवृष्टीमुळे बधितांना त्वरित भरपाई द्या-अजित कवडे*
*अतुल वारे पाटील-करमाळा*
करमाळा तालुक्याच्या पश्चिम भागासह संपूर्ण तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून या सर्व शेतकऱ्यांना शासनाने त्वरित भरीव आर्थिक मदत द्यावी अशी मागणी संभाजी ब्रिगेड करमाळा माढा विधानसभा मतदार संघ अध्यक्ष अजित कवडे यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे.
यात त्यांनू नमूद केले आहे की,करमाळा तालुक्याच्या पश्चिम भागात सर्वाधिक नुकसान केळी व ऊस पिकांचे झाले आहे. पिके जमीनदोस्त झाली असून शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास निसर्गाच्या अवकृपेमुळे हिरावला गेला असून झालेला खर्च कसा भरून काढायचा हा गंभीर प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला असून मुलांचे शिक्षण, मुलींचे लग्न, वैद्यकीय गरजा कशा पद्धतीने भागवायच्या असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे. ऊस ,केळीबरोबर मका, कांदा या पिकांचेही अपरिमित नुकसान झाले असून शासनाने नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदत देण्याचे आवाहन अजित कवडे यांनी या निवेदनाद्वारे केले आहे.संभाजी ब्रिगेड शेतकऱ्यांच्या सोबत असून त्वरित कार्यवाही न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी या निवेदनाद्वारे दिला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा