Breaking

रविवार, २९ नोव्हेंबर, २०२०

कुर्डुवाडी पोलीस स्टेशनच्या निष्क्रीय कारभारामुळे अवैध धंदे, गुंडगिरी वाढली*


*कुर्डुवाडी पोलीस स्टेशनच्या निष्क्रीय कारभारामुळे अवैध धंदे, गुंडगिरी वाढली*
**********************************

   *गेमबाजांना अर्थपूर्ण पोलिसी आशिर्वाद... पोलिस खात्यातच नाराजीचा सूर अन् बेदीली...*
   *पोलिस निरीक्षकाच्या जातीयवादी कारभाराविरुध्द जनतेचा जाहीर आक्रोश...पुदाळ नवरा...*
    *वरिष्ठही घेईनात दखल सर्वसामान्यांमथ्ये असुरक्षेची भावना...*
-------------------------------------------------

*AJ 24 Taas News Maharashtra*
 कुर्डूवाडी प्रतिनिधी अरूण कोरे

   *कुर्डुवाडी शहरांत सर्वसामान्य जनता गेल्या अनेक महिन्यांपासून जीव मुठीत धरून जगत असून कुर्डुवाडी पोलिस ठाण्याच्या निष्क्रिय अधिका-यामुळे दिवसाढवळ्या मुंबईचे गुंडाराज सुरू झाल्याने पोलिस खात्यावरील विश्र्वासच उडत चालल्याचे दिसत असून वरिष्ठ केव्हा दखल घेणार?असा संतप्त सवाल नागरिकांतून विचारला जातो आहे.*
       *कुर्डुवाडी शहरात सध्याचे पोलिस निरीक्षक रविंद्र डोंगरे यांच्या गैर,बेकायदेशीर व जातीयवादी कारभाराबाबत अनेकदा वरिष्ठांकडे तक्रारी गेल्या आहेत.परंतू वरिष्ठांकडून त्याची योग्य ती दखल घेऊन कारवाई न होता वरिष्ठ अधिका-यांच्या अर्थपूर्ण व्यवहारात त्या फ्रीज केल्यात की काय अशी शंका उपस्थित केली जाते आहे.*
       *कुर्डुवाडी शहरांत चो-यांचे प्रमाण वाढले होते,दिवसा ढवळ्या महिलाची मंगळसुत्रे लुटणे, खोट्या तक्रारी नोंदवण्यास भाग पाडून दहशतीखाली अर्थपूर्ण व्यवहारात माहीर असलेल्या अधिका-याचा मालामाल डोंगर कधी हटणार याची जनता भाबड्या आशेने नूतन पोलिस अधीक्षक तेजस्विनी सातपुते यांच्याकडे डोळे लावून बसली आहे.*
   *गुन्हा नोंद करण्यास गेले असता हिटलरी निरीक्षकाशिवाय गुन्हा नोंद होत नाही व तासंतास तिष्ठत ठेवले जाते अट्टल गुन्हेगारांना मात्र खुलेआम प्रवेश असा आहे कारभार*
      *गुन्हेगारांवर वचकच नसल्याने व गुडाराजला अधिका-यांचा असलेला वरदहस्त यामुळे टोळीयुद्ध सदृष्य परिस्थिती उभी राहिल्याने खाकीची सर्वत्र नाचक्की होत आहे.*
      *टोळीयुद्धास कुर्डुवाडीत २३ जून रोजी ढवळसकर बंधूवर गोळीबाराने सुरुवात झाली.याप्रकरणी तपास अधिकारी म्हणून निरीक्षक रविंद्र डोंगरे यांची नेमणूक झाली.तपासअधिका-यालाच फिर्यादीच्या घरात व दुकानात सी.सी.टी.व्ही.आहेत हे पत्रकार सांगेपर्यंत आठवडाभर माहीत नसल्याने तपासात त्याने काय दिवे लावले हे गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकानेच याचे पितळ उघडे पाडले ते बरेच झाले म्हणायचे.अधिका-यास पांच पथकाकडून चालणारा तपासच माहीत नसवा व त्यांचे अपडेट्स त्यास माहीत नसावेत यासारखे पोलिस खात्याचेही दुर्देव नसावे.*
    *पोलिस खात्याच्या इभ्रतीखातर खोटे आरोपी गोवले की काय असा सवाल नागरिकांबरोबरच पोलिस खात्यात दबक्या आवाजापेक्षा उघड माथ्याने चर्चिला जात असेल तर कसा ठेवायचा तपास अधिकाऱ्यांवर व आरोपींवर विश्वास?खरे आरोपी कोण?पकडलेले की उर्वरित राहीलेले? यांचे गुढही अद्याप अनाकलनीय.*
   *कुर्डुवाडी शहरांत खुले आम दारु,गांजा,अवैध वाळू,मटका, आॅनलाईन लाॅटरी,बुकी सुरू आहे त्यास वरदहस्त कुणाचा? अधिका-यांचा की अर्थपूर्ण व्यवहारातील वरिष्ठांचा?याचा शोध नूतन पोलिस अधीक्षक तेजस्विनी सातपुते मॅडम लावतील काय?असा उघड सवाल उपस्थित केला जात आहे.*
     *गेल्या चार महिन्यांत ढवळसकर बंधू गोळीबाराने नागरिक कुठे निश्वास सोडतायत तोपर्यंत चालू महीन्यात पुन्हा व्यापारी लुटीने शहर हादरलं.भर दिवसा सराफी व्यापा-यास लुटलं जात...चाव्या गेल्याचा गुन्हा नोंद पण रिव्हाॅल्वरच्या धाकेचा गुन्हा गायबच.हेही न उकलणारे कोडेच.*
   *हेही काही कमी नाही म्हणून भरीत भर माढा रस्त्यावरील रहदारीच्या रस्त्यावर एटीएम फोडून अकरा लाखांच्या वर रक्कम गायब होऊन आठवडा उलटत आला तरी गुन्हेगारांचा मार्गच माहीत नसेल तर सापडणार कधी?*
    *टेंभुर्णी रोडवर पोलिस निरीक्षक रविंद्र डोंगरे व बरेच अधिकारी व कर्मचारीही रहातात.अधिका-याच्या घरासमोर गोळीबारातील आरोपी घोषणा देऊन गायब होतात, घरासमोर व घराभोवतालची दुकानें फोडली जातात, गुन्हा नोंदीबाबत अधिका-याची चापलूसगिरी,खुले आम अधिका-यांच्या घरापासून मार्केट यार्ड पर्यत गुटका विक्री हे जनता उघड्या डोळ्याने पहात असताना गुटख्याच्या पिचकारी एवढी घृणा पोलिस निरीक्षकाबाबत येवू लागली आहे.मग राहातो प्रश्र्न पेट्रोलींग कागदावर आहे की निष्क्रिय अधिका-यांच्या मनमानीवर?*
    *कुर्डुवाडीचे पोलिस निरीक्षक म्हणजे पुदाळ नवरा...अशी अवस्था झाली असून सर्व सामान्य नागरिकांचा अंत टोळीयुद्धाचा भडका उडण्याआधी नवीन पोलिस अधीक्षक तेजस्विनी सातपुते मॅडम यांनी स्वतंत्र जनता दरबार अथवा पत्रकार परिषद घेऊन निष्क्रिय पोलिस निरीक्षकाची गच्छंती तातडीने करुन पोलिस खात्याची राहीली सुर्ली इभ्रत वाचवून जनतेला भयमुक्त करावे अशी अपेक्षा सर्व सामान्य नागरिकांबरोबरच, व्यापारी वर्गातून व्यक्त केली जात आहे.*
      *पोलिस चांगले काम करत असताना अधिका-याची मुजोरी कुठपर्यंत?*
    *अन्यथा जनआंदोलन अटळ?*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा